spot_img
ब्रेकिंगटेन्शन वाढवणारी बातमी! 'या' लाडक्या बहिणींचा हप्ता होणार बंद?, कारण आलं समोर...

टेन्शन वाढवणारी बातमी! ‘या’ लाडक्या बहिणींचा हप्ता होणार बंद?, कारण आलं समोर…

spot_img

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता ज्या महिलांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचा लाभ आता बंद केला जाणार आहे. २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. यासाठी आता पडताळणी केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी पाच टप्प्यांमध्ये केली जात आहे. यात आतापर्यंत ज्या महिला दोन योजनांचा लाभ घेत आहे त्यांना आता फक्त कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता होणार आहे. त्यानंतर आता लाडक्या बहि‍णींच्या उत्पन्नाची तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून बाद केले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फटका बसणार आहे.

सध्या लाडकी बहीण योजनेत २.५३ कोटी महिला लाभार्थी आहेत.या महिलांच्या लाभाची अपेक्षित रक्कम ३७,९५० कोटी रुपये आहे. बजेटमध्ये ३४००० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार उरलेल्या पैशांसाठी काय करणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. याआधी लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांचाही समावेश आहे. त्यानंतर आता उत्पन्न चेक केले जाणार आहे. जर या पडताळणीत तुमचे उत्पन्न जास्त असल्याचे निदर्शनास आले तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘राज्यमंत्री मंडळाची बैठक ‘या’ तारखेला अहिल्यानगरमध्ये भरणार’; जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडले जाणार?

जामखेड । नगर सहयाद्री:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मे महिन्याच्या अखेरीस...

पूजा खेडकर प्रकरणात मोठा निर्णय; सुप्रिम कोर्टात काय घडलं?, वाचा एका क्लिकवर..  

IAS Pooja Khedkar News: UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा...

तुमच्या घरावर भानामती? कुटुंबावर संकट! दोन महिलांनी रचला डाव; ३३ लाखाची ‘अशी’ केली फसवणूक

Maharashtra Crime News: आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जात आहे. यातून फसवणूक झाल्याचे देखील समोर...

नागरिकाभिमुख कारभारासाठी महानगरपालिका कटीबद्ध; आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासकीय कामकाजासाठी ई ऑफीस प्रणालीचा वापर सुरू...