spot_img
अहमदनगर'टाकळी' चंदन तस्करीचे केंद्रबिंदू! कोटीचा कंटेनर मास्टरमाईडच्या आदेशाने दोन लाखांसाठी धावला...

‘टाकळी’ चंदन तस्करीचे केंद्रबिंदू! कोटीचा कंटेनर मास्टरमाईडच्या आदेशाने दोन लाखांसाठी धावला…

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
रक्तचंदनाची कंटेरमधून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन चंदन तस्करांना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपरी चिंचवड पोलीसांनी पकडले. त्यांच्याकडून 25 कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त करण्यात आले. राजाराम गंगाराम गावखे (वय-37, रा. काळेवाडी, सावरगांव ता. पारनेर) व हरप्रितसिंग धरमसिंग बदाना (रा. ठाणे) यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पिंपरी पोलिसांनी गाडी मालक दिपक साळवे (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) यालाही गुरुवारी रात्री ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन कोट्यावधी रुपयांच्या रक्तचंदनाची तस्करी होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी द्रुतगती मार्गावरील उसें टोलनाक्यावर सापळा लावून सिलबंद असलेल्या चाळीस फूट कंटेनर पकडला. कंटेनरसोबत असलेल्या इतर व्यक्तींची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली.

कंटेनर चालक तसेच त्यासोबत असलेल्या इतरांकडून प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी वन विभागाचे अधिकारी तसेच पंचासमक्ष कंटेरनचे सील तोडून पाहणी केली असता त्यात तब्बल 25 कोटी रुपये किंमतीचे रक्तचंदन आढळून आले. दरम्यान पोलिसांनी अधिक तपास केला असता कंटेरचा मालक दिपक साळवे यांना रात्री पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गाडीला दोन लाखांचे भाडे
तब्बल 25 कोटी रुपये किंमतीचे रक्तचंदनाची वाहतूक करणारा कंटेनर पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे-मुंबई ध्रुतगती मार्गावर पकडला. पोलिसांनी कंटेनर मालकाला ताब्यात घेतले आहे. गाडीचा वापर रक्तचंदन तस्करीसाठी होणार असल्याची माहिती गाडी मालकाला होती. त्यासाठी गाडीला दोन लाखांचे भाडे ठरले असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...