spot_img
अहमदनगरAhmednagar: टॅगिंग करत स्वतंत्र पथक नेमणार! 'या' काळ्या धंद्याला ब्रेकच लावणार: खासदार...

Ahmednagar: टॅगिंग करत स्वतंत्र पथक नेमणार! ‘या’ काळ्या धंद्याला ब्रेकच लावणार: खासदार विखे पाटील

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
महाराष्ट्रातील दुभत्या जनावरांची संख्या व दूध उत्पादन यात तफावत असून, दूध भेसळीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्यभरातील दुभत्या जनावरांना टॅगिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे भेसळीवर नियंत्रण येईल, असे मत खा. डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केले.

पत्रकार दिनानिमित्त खा. डॉ. विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या नवीन निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात दूधभेसळ होत असल्यामुळे दुधाचे प्रमाण वाढले आहे.

परिणामी दुधाचे दर घसरले आहेत. खरेदी दर वाढविणे शय नसल्याने आता शासनाने दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले आहे. हे अनुदान जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांसाठी देण्याचे जाहीर केले आहे.

सुरुवातीला फक्त सरकारी सहकारी दूध संस्थांना दूध घालणार्‍या दूध उत्पादक शेतकर्‍यांनाच हे अनुदान देण्यात येणार होते. मात्र, त्यातील त्रुटी लक्षात आल्यानंतर सरसकट अनुदान देण्यात येणार आहे.

भेसळखोरांचे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी टॅगिंग

भेसळ करणारे लोक दुधात युरिया, तूप, दुधाची पावडर आदी रासायनिक पदार्थाचा वापर करतात. भेसळखोरांचे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी टॅगिंग सिस्टीम वापरली जाणार आहे. टॅगिंग केल्याने साधारण एक जनावर किती दूध देते, याचा अंदाज येईल. त्यामुळे भेसळीवर निर्बंध येतील. राज्यातील भेसळखोरांचे रॅकेट संपवण्यासाठी ही टँगिंग मोहिम पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरू केल्याची माहिती खा. विखे यांनी दिली.

प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पथक
दुधातील भेसळ रोखणे अतिशय कठीण असल्यामुळे सरकारने नवीन उपाय शोधला आहे. त्यासाठी दुभत्या जनावरांचे टॅगिंग केले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र भेसळविरोधी तपासणी पथक तयार केले आहे. अशी पथके गावोगावी तपासणी करणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...