spot_img
अहमदनगरजिल्ह्यात कायद्याचा जरब बसविणार: एसपी घार्गे

जिल्ह्यात कायद्याचा जरब बसविणार: एसपी घार्गे

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री;-
राजकीयदृष्ट्‌‍या प्रबळ असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. तसेच, राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा हा जिल्हा आहे. या जिल्ह्यात सर्व प्रकारच्या क्राईमच्या घटना घडत असल्याने पोलिसांसाठी हा आव्हानात्मक जिल्हा आहे. पोलिसांकडून नागरिकांना अनेक अपेक्षा असतात. नागरिकांच्या या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून प्रयत्न करतील, असे प्रतिपादन नूतन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.

अधीक्षक घार्गे यांनी शुक्रवारी पदाचा कार्यभार स्वीकारताच सर्व विभागांचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना निरोप देऊन नूतन अधीक्षक घार्गे यांचे पोलिस दलाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी ओला यांनी त्यांचे स्वागत केले. अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, वैभव कलुबर्मे आदींसह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. अधीक्षक घार्गे म्हणाले की, महिला, ज्येष्ठ नागरिक, बालक, विविध समाज घटक डोळ्यासमोर ठेवून काम केले जाईल. कर्मचाऱ्यांचे प्रश्नही सोडवले जातील. नागरिकांना तत्काळ मदत मिळेल, यादृष्टीने काम करू, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अधीक्षक ओला म्हणाले, जिल्ह्यात मनुष्यबळ कमी आहे. त्या तुलनेत गुन्हेगारी जास्त असल्याने पोलिसांवर कामाचा ताण निश्चित आहे. वाढते गुन्हे आणि मोठा जिल्हा, यामुळे या जिल्ह्यात काम करणे मोठे आव्हान होते. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणूका पार पाडण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर होते. या दोन्ही निवडणूक शांततेत पार पडल्या. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यात चांगले काम करता आले, असे ते म्हणाले. यावेळी अपर अधीक्षक प्रशांत खैरे, वैभव कलबुर्मे, पोलिस निरिक्षक दिनेश आहेर, उपअधीक्षक अमोल भारती, निरिक्षक आनंद कोकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकाच घरात ४ जणांचा गळफास, कॅन्सर झाल्यामुळे टाटा स्टीलच्या मॅनेजरचा टोकाचा निर्णय

नगर सह्याद्री वेब टीम : कॅन्सर झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलांसह...

राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू नगरमध्ये येणार; सभापती आ. राम शिंदे यांनी दिली माहिती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड) राष्ट्रीय स्मारक होण्याच्यादृष्टीने...

शहिद जवान संदिप गायकर यांचे बलिदान व्‍यर्थ जाणार नाही: मंत्री विखे पाटील

ब्राम्‍हणवाडा येथे शहिद स्‍मारक उभारणार अकोले । नगर सहयाद्री:- शहिद जवान संदिप गायकर यांनी देशाच्‍या सेवेसाठी...

कुत्रा पाळण्यावरुन वाद पेटला, पुढे नको तोच प्रकार घडला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- वैदुवाडी, सावेडी परिसरात कुत्रा पाळण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोन भावांना मारहाण...