spot_img
ब्रेकिंगसूर्य ओकतोय आग! 'या' वेळेत घराबाहेर न पडण्याचा इशारा

सूर्य ओकतोय आग! ‘या’ वेळेत घराबाहेर न पडण्याचा इशारा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
राज्यभरात उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. गेल्या तीन, चार दिवसांपासून तापमान वाढू लागलं असून येत्या काही दिवसांत राज्यात वातावरण तापणार असल्याची चिन्हं आहेत. पुणे, मुंबई शहरांमध्ये उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. डोक्यावर सूर्य येण्या अगोदरच म्हणजेच दुपारी बारा वाजण्याअगोदरच अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार असल्याचं पाहायला मिळालं आहे.

महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई आणि रायगड यांसारख्या शहरांसाठी एक वेगळी चेतावणी हवामान विभागाने जारी केली आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि ठाण्यात किमान तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तविली आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे तर उकाड्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

तापमान वाढीमुळे उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. राज्यात सध्या सूर्य आग ओकत असून भरलेल्या रस्त्यावर देखील शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात सोमवार म्हणजेच १५ एप्रिल आतापर्यंतचा सर्वांत उष्ण दिवस ठरला आहे. त्यादिवशी जिल्ह्यात तापमान चाळीशीपार गेले होते. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरात सर्वाधिक ४३.२ तर बदलापूर शहरात ४२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते.

आरोग्य विभागानं नागरिकांना दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिलाय. तसंच ज्या वेळी उन्हाची तीव्रता जास्त असते, अशा वेळी अल्कोहोल, चहा, कॉफी आणि साखरेचं प्रमाण जास्त असलेल्या शीतपेयांपासून दूर राहण्याचंही आवाहन केलंय. खबरदारीचा उपाय म्हणून, सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष बेड, द्रवपदार्थ आणि औषधे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...