spot_img
ब्रेकिंगआला उन्हाळा, तब्येत 'अशी' सांभाळा...! राज्याचा पारा 'इतक्या' अंशावर, जाणून घ्या एका...

आला उन्हाळा, तब्येत ‘अशी’ सांभाळा…! राज्याचा पारा ‘इतक्या’ अंशावर, जाणून घ्या एका क्लिकवर

spot_img

नगर सह्याद्री टीम-
दिवसाचे कमाल तापमान आणि रात्री थंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. आता हिट वाढू लागली आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात कमाल तापमान ३५ अंशांच्या वर गेले आहे. वाढत्या तापमानामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.

महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्याने यंदा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार उन्हाची तीव्रता जाणविण्यास सुरुवात झाली असून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे.

मार्च महिन्यापासूनच उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या असून त्याची तीव्रता ही एप्रिल आणि मे या महिन्यात वाढतच जाइल. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे,अशक्तपणा वाढणे,काम कमी केले तरी जास्त दमायला होणे तसेच घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर टाकली जाणे ह्या बाबींची देखील सुरुवात होते. तापमान बदल व वाढत्या उष्णतेमध्ये पुरेशी काळजी घेतली नाही तर उन्हाळ्यामुळे उद्भवणार्‍या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

आला उन्हाळा; तब्येत ‘अशी’ सांभाळा…!

डोक्याला रुमाल बांधून बाहेर पडावे.

खोलीचे तापमान थंड ठेवावे.

मीठ, साखर व पाणी यांचे केलेले मिश्रण द्यावे.

लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव्य पदार्थ घ्यावे.

बाहेर पडताना डोक्यावर टोपी रुमाल न्यावा.

उन्हाळ्यात कोणते पेय घ्यावे व कसे?

डाळिंबाचे सरबत हे पित्तशामक असते. लिंबू सरबत आणि उसाच्या रसाचे सेवन करावे.

नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. 3.कोकम सरबताचे सेवन करावे.

आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही कोकम सरबत उन्हाळ्याच्या दिवसात नक्कीच पिऊ शकता.

फ्रिजमधील पाणी न पिता घरात माठ असेल तर त्यातील पाणी सेवन करावे. तसंच उन्हातून आल्या आल्या अजिबात पाणी पिऊ नये.

पाण्याबरोबर गुळाचे सेवन करणे योग्य ठरते. म्हणजे उष्माघाताचा त्रास होत नाही.

या काळात शक्यतो पचायला हलका व कमी आहार घ्यावा. यामध्ये मुगाची खिचडी किंवा वरण-भात तसेच, सर्व पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे.

टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी, द्राक्षे आदी फळांचे सेवन वाढवावे.

थंड तुपाचाही आहारात समावेश करावा.

नारळ पाणी, ऊसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा, जेवणानंतर ताकही घ्यावे.
उन्हाळ्यात व्यायाम कसा करावा

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुपा एमआयडीसीत कंपनीने केला विश्वासघात! 150 युवकांना नोकरीच्या नावाखाली फसवले

सुपे MIDC मधील GMCC कंपनीत 150 युवकांवर अन्याय../ पारनेर भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मनोज...

देवेंद्रजी, नगरमध्ये बीडीओच लाचखोर निघाला हो!

मिनी मंत्रालय झाले अधिकाऱ्यांचे चरण्याचे कुरण | आनंद भंडारी यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषद- पंचायत...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार बिनव्याजी कर्ज..

मुंबई । नगर सहयाद्री राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मोठा दिलासा...

केडगावात विजेचा लपंडाव! माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला इशारा; ‌‘वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा… ’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगराचा गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे...