spot_img
ब्रेकिंगआला उन्हाळा, तब्येत 'अशी' सांभाळा...! राज्याचा पारा 'इतक्या' अंशावर, जाणून घ्या एका...

आला उन्हाळा, तब्येत ‘अशी’ सांभाळा…! राज्याचा पारा ‘इतक्या’ अंशावर, जाणून घ्या एका क्लिकवर

spot_img

नगर सह्याद्री टीम-
दिवसाचे कमाल तापमान आणि रात्री थंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. आता हिट वाढू लागली आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात कमाल तापमान ३५ अंशांच्या वर गेले आहे. वाढत्या तापमानामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.

महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्याने यंदा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार उन्हाची तीव्रता जाणविण्यास सुरुवात झाली असून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे.

मार्च महिन्यापासूनच उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या असून त्याची तीव्रता ही एप्रिल आणि मे या महिन्यात वाढतच जाइल. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे,अशक्तपणा वाढणे,काम कमी केले तरी जास्त दमायला होणे तसेच घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर टाकली जाणे ह्या बाबींची देखील सुरुवात होते. तापमान बदल व वाढत्या उष्णतेमध्ये पुरेशी काळजी घेतली नाही तर उन्हाळ्यामुळे उद्भवणार्‍या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

आला उन्हाळा; तब्येत ‘अशी’ सांभाळा…!

डोक्याला रुमाल बांधून बाहेर पडावे.

खोलीचे तापमान थंड ठेवावे.

मीठ, साखर व पाणी यांचे केलेले मिश्रण द्यावे.

लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव्य पदार्थ घ्यावे.

बाहेर पडताना डोक्यावर टोपी रुमाल न्यावा.

उन्हाळ्यात कोणते पेय घ्यावे व कसे?

डाळिंबाचे सरबत हे पित्तशामक असते. लिंबू सरबत आणि उसाच्या रसाचे सेवन करावे.

नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. 3.कोकम सरबताचे सेवन करावे.

आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही कोकम सरबत उन्हाळ्याच्या दिवसात नक्कीच पिऊ शकता.

फ्रिजमधील पाणी न पिता घरात माठ असेल तर त्यातील पाणी सेवन करावे. तसंच उन्हातून आल्या आल्या अजिबात पाणी पिऊ नये.

पाण्याबरोबर गुळाचे सेवन करणे योग्य ठरते. म्हणजे उष्माघाताचा त्रास होत नाही.

या काळात शक्यतो पचायला हलका व कमी आहार घ्यावा. यामध्ये मुगाची खिचडी किंवा वरण-भात तसेच, सर्व पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे.

टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी, द्राक्षे आदी फळांचे सेवन वाढवावे.

थंड तुपाचाही आहारात समावेश करावा.

नारळ पाणी, ऊसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा, जेवणानंतर ताकही घ्यावे.
उन्हाळ्यात व्यायाम कसा करावा

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...

उद्धव ठाकरे दोन शिलेदारांसह ‘शिवतीर्थवर’; पुन्हा एकदा घेतली राज ठाकरेंची भेट, युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई  । नगर सहयाद्री:- महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब...