spot_img
अहमदनगरAhmednagar News:...म्हणुन ग्रामसेवक गिरींचे निलंबन? नेमकं प्रकरण काय

Ahmednagar News:…म्हणुन ग्रामसेवक गिरींचे निलंबन? नेमकं प्रकरण काय

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत नगर तालुयातील सांडवे येथील ग्रामसेवक नितीन शेषराव गिरी यांना निलंबित करण्यात आले आहे. १६ मे रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी निलंबनाचा आदेश काढला.

गिरी यांची नेमणूक सांडवा येथे होती. तेथे कार्यरत असताना त्यांनी कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केला. त्यांना पुरेशी संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. जि. प. कर्मचार्‍याने सदैव निरपराध, सचोटीने वागणे व कर्तव्यपरायण असणे आवश्यक आहे. तथापि गिरी यांनी गैरवर्तन करून महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम १९६७ चा नियम ३ चा भंग केला आहे.

त्यामुळे त्यांना निलंबित केल्याचे आदेशात म्हटले आहे. निलंबन काळात गिरी यांचे मुख्यालय कोपरगाव पंचायत समिती असेल. तसेच त्यांना कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...