spot_img
अहमदनगरAhmednagar News:...म्हणुन ग्रामसेवक गिरींचे निलंबन? नेमकं प्रकरण काय

Ahmednagar News:…म्हणुन ग्रामसेवक गिरींचे निलंबन? नेमकं प्रकरण काय

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत नगर तालुयातील सांडवे येथील ग्रामसेवक नितीन शेषराव गिरी यांना निलंबित करण्यात आले आहे. १६ मे रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी निलंबनाचा आदेश काढला.

गिरी यांची नेमणूक सांडवा येथे होती. तेथे कार्यरत असताना त्यांनी कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केला. त्यांना पुरेशी संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. जि. प. कर्मचार्‍याने सदैव निरपराध, सचोटीने वागणे व कर्तव्यपरायण असणे आवश्यक आहे. तथापि गिरी यांनी गैरवर्तन करून महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम १९६७ चा नियम ३ चा भंग केला आहे.

त्यामुळे त्यांना निलंबित केल्याचे आदेशात म्हटले आहे. निलंबन काळात गिरी यांचे मुख्यालय कोपरगाव पंचायत समिती असेल. तसेच त्यांना कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जरांगेंसह मराठ्यांच्या रोषाचे धनी देवेंद्र फडणवीस?

आंदोलनाची व्याप्ती वाढत चालल्याने देवाभाऊंसह गृहखात्याची संपूर्ण यंत्रणा सपशेल अपयशी | जरांगे पाटलांची मुख्य...

‘आंदोलनाला परवानगी दिलीच कशी?’ हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, कोर्टात नेमकं काय घडलं? दिला मोठा आदेश

मुंबई / नगर सह्याद्री - Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदान येथे मनोज...

आंदोलनावर तोडगा न निघाल्यास…; पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाचा इशारा..

पारनेर | नगर सह्याद्री मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते...

सीएसएमटी स्थानकात आंदोलकांचा गोंधळ!, लोकल अडवली, पुढे नेमकं काय घडलं?

रुळावर उतरून लोकल अडवली | चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र मुंबई | नगर सह्याद्री मराठा आरक्षणाचा मुद्दा...