spot_img
अहमदनगरAhmednagar News:...म्हणुन ग्रामसेवक गिरींचे निलंबन? नेमकं प्रकरण काय

Ahmednagar News:…म्हणुन ग्रामसेवक गिरींचे निलंबन? नेमकं प्रकरण काय

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत नगर तालुयातील सांडवे येथील ग्रामसेवक नितीन शेषराव गिरी यांना निलंबित करण्यात आले आहे. १६ मे रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी निलंबनाचा आदेश काढला.

गिरी यांची नेमणूक सांडवा येथे होती. तेथे कार्यरत असताना त्यांनी कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केला. त्यांना पुरेशी संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. जि. प. कर्मचार्‍याने सदैव निरपराध, सचोटीने वागणे व कर्तव्यपरायण असणे आवश्यक आहे. तथापि गिरी यांनी गैरवर्तन करून महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम १९६७ चा नियम ३ चा भंग केला आहे.

त्यामुळे त्यांना निलंबित केल्याचे आदेशात म्हटले आहे. निलंबन काळात गिरी यांचे मुख्यालय कोपरगाव पंचायत समिती असेल. तसेच त्यांना कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...