spot_img
अहमदनगरAhmednagar News:...म्हणुन ग्रामसेवक गिरींचे निलंबन? नेमकं प्रकरण काय

Ahmednagar News:…म्हणुन ग्रामसेवक गिरींचे निलंबन? नेमकं प्रकरण काय

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत नगर तालुयातील सांडवे येथील ग्रामसेवक नितीन शेषराव गिरी यांना निलंबित करण्यात आले आहे. १६ मे रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी निलंबनाचा आदेश काढला.

गिरी यांची नेमणूक सांडवा येथे होती. तेथे कार्यरत असताना त्यांनी कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केला. त्यांना पुरेशी संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. जि. प. कर्मचार्‍याने सदैव निरपराध, सचोटीने वागणे व कर्तव्यपरायण असणे आवश्यक आहे. तथापि गिरी यांनी गैरवर्तन करून महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम १९६७ चा नियम ३ चा भंग केला आहे.

त्यामुळे त्यांना निलंबित केल्याचे आदेशात म्हटले आहे. निलंबन काळात गिरी यांचे मुख्यालय कोपरगाव पंचायत समिती असेल. तसेच त्यांना कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पारनेरमध्ये उलथापालथ; उपमुख्यमंत्री पारनेरमध्ये; कोण कोण करणार प्रवेश पहा

पदाधिकार्‍यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती | सुजित झावरे पाटील यांचा शिवसेत पक्षप्रवेश पारनेर / नगर...

किरण काळे यांचे आरोप बिनबुडाचे, निराधार; जैन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथ्था काय म्हणाले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगरमधील जैन मंदिर ट्रस्टची जागा हडपल्याचा उबाठाचे किरण काळे यांनी केलेला...

अतिवृष्टीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा, कुठे केली पाहणी पहा

ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीचा घेतला सविस्तर आढावा अहिल्यानगर / नगर सह्याद्री जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या...

सोलर पॅनल बसवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पावणेतीन लाखांचा गंडा;

माजी सैनिकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री 'प्रधानमंत्री सूर्य घर योजने'अंतर्गत सोलर पॅनल...