spot_img
अहमदनगरआनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री”-
शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक तसेच गौरीघुमट ते पटवर्धन चौक परिसरात मैलायुक्त गाळाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आनंदी बाजारात परिसरात भुयारी गटार व रस्ता काँक्रिटीकरण काम मंजूर आहे तसेच या कामाचे भूमिपूजन होऊन अनेक महिने उलटून गेले आहे. तरी देखील कामास सुरवात न केल्याने येथील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाऊस झाल्यानंतर सदर परिसरात नवीन भुयारी गटार नसल्याने मोठ्या प्रमाणात मैलायुक्त गाळ साचून दुर्गंधी पसरली आहे.

तसेच शहरातील गांधी मैदान परिसरातील मागील पन्नास वर्षाचा पावसाच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. पाऊस पडला की मंगल गेट परिसरापासून चितळे रोड, गांधी मैदान, पटवर्धन चौक, आनंदी बाजार, गाडगीळ पटांगण या परिसराला अक्षरशः नदीचे स्वरूप येत असते.

अनेक नागरिकांच्या घरामध्ये तसेच दुकानात पावसाचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. सदरचा कामासाठी निधीही उपलब्ध झालेला असून प्रारंभ करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून सदरचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....