spot_img
ब्रेकिंगएसआयटी चौकशीचे आदेश: जरांगे पाटील आक्रमक! म्हणाले, १०० टक्के सत्तेचा वापर, सलाइनसह...

एसआयटी चौकशीचे आदेश: जरांगे पाटील आक्रमक! म्हणाले, १०० टक्के सत्तेचा वापर, सलाइनसह उभा राहणार अन..

spot_img

छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री-
देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून गोळी चालवणार हे मला आधिपासून माहिती होतं. जी चौकशी करायची ती करा. आंदोलनावेळी मला सर्वात जास्त फोन देवेंद्र फडणवीस यांचेच आले आहेत. तुम्ही माझ्यासोबत काय बोललात हे सगळं मी सांगणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. एसआयटी चौकशीच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस १०० टक्के सत्तेचा वापर करत आहेत. आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. कारण मला माहितीये माझा कुठेच दोष नाही. मी प्रत्येक चौकशीला समोरा जाण्यासाठी तयार आहे. चौकशीमध्ये देवेंद्र फडणवीसांचे जास्त कॉल रेकॉर्डींग असतील. त्यामुळे ते यात काय काय बोललात हे सर्वकाही समोर येईल, अशी प्रतिक्रिया जरांगेंनी दिली आहे. तुम्ही आता जरी चौकशीला सुरूवात केली तरी मी तयार आहे. हातला लावलेल्या सलाइन सकट मी चौकशीसाठी उभा राहिल, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी २ दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील आरोप केले. यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी सत्ताधारी आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमक
देवेंद्र फडणवीस सत्तेचे वापर करणार आहेत. माझा कुठेच दोष नाही. मी कुठे जाण्यास तयार आहे. कुठेही कोणत्याही चौकशी करा, मी तयार आहे. मला पाठिंब्यासाठी कोणाचा फोन नाही. कोणाचे पैसे नाही. मला सर्वात जास्त फोन तुमचे आले आहे. मी तुमचेही प्रकरण काढतो. आता सर्व चौकशी करावी लागेल. त्यातून सुट्टी नाही. ६०० अधिकारी जातील. ज्या मंत्र्यांने आदेश दिले ते जातील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...