spot_img
महाराष्ट्रअँपल मोबाईलच्या बनावट ऍक्सेसरी विकणाऱ्या दुकानांवर छापे, सात आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

अँपल मोबाईलच्या बनावट ऍक्सेसरी विकणाऱ्या दुकानांवर छापे, सात आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर शहरातील वाडियापार्क येथे अँपल मोबाईलच्या बनावट ऍक्सेसरी विकणाऱ्या सहा दुकानांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत 37 लाख 62 हजार 369 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

14 मार्च 2024 रोजी जीआयपीएस प्रा.लि. मुंबई या कंपनीचे मुख्य तपासी अधिकारी कुंदन गुलाबराव बेलोशे (रा.ज्ञानदेव म्हात्रे चाळ, पूर्व कल्याण) यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना समक्ष भेट देऊन अहमदनगर शहरातील वाडीया पार्क कॉम्प्लेक्स अहमदनगर येथील मोबाईल दुकानांमध्ये ऍ़पल कंपनीच्या नावाचा वापर करुन ऍ़पल कंपनीचा लोगो असलेली बनावट ऍ़क्सेसरी विक्री होत असल्याची माहिती दिली. पोलीस अधीक्षक ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना याबाबत कळवून खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

आहेर यांनी पोउपनि/तुषार धाकराव,पोलीस अंमलदार संदीप पवार, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, गणेश भिंगारदे, अतुल लोटके, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, रविंद्र घुंगासे, बाळासाहेब गुंजाळ, आकाश काळे, किशोर शिरसाठ, सागर ससाणे आदींचे पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने वाडीया पार्क कॉम्प्लेक्समध्ये माँ चामुण्डा मोबाईल कवर, ग्लास होलसेल विक्रेता या दुकानामध्ये हिमताराम वालारामजी चौधरी यासह 13 लाख 50 हजार 967 रुपयांचा मुद्देमाल,

व्हाईस टेलिकॉम मोबाईल ऍ़क्सेसरीज या दुकानात धनराज चंद्रकांत डेंगळे, रुपेश सुराणा  (फरार) यासह 14 लाख 82 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला. या दुकानासह सहा दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. यात 7 इसमांना ताब्यात घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...