spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! अचानक जोडप्याने आयुष्य संपवलं, विषारी औषध प्राशन करून आत्महत्या, कारण...

धक्कादायक! अचानक जोडप्याने आयुष्य संपवलं, विषारी औषध प्राशन करून आत्महत्या, कारण…

spot_img

Maharashtra Crime News: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संभाजीनगरमध्ये घडली. पैठण तालुक्यातील कातपूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप राहणाऱ्या जोडप्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. नवनाथ आणि शितल अशी आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कातपूर येथे नवनाथ शामराव जगधने (३० वर्षे) आणि शितल दोडवे-उघडे (२८ वर्ष) हे दोघे ५ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांनीही घराच्या टेरेसवर गोचीड मारण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. नवनाथ गुन्हेगार होता. तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. पॅरोलवर तो बाहेर आला होता. त्याचवेळी दोघांनीही टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

नवनाथ जगधनेला जालन्यातील अंबड येथे ६ वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि तो कारागृहात शिक्षा भोगत होता. सध्या तो एका महिन्याच्या पॅरेल सुट्टीवर आला होता. त्याला २८ मार्चला पुन्हा शिक्षा भोगण्यासाठी तुरूंगात जाण्यासाठी जायचे होते. पण त्यापूर्वीच नवथान आणि शीतलने आत्महत्या केली.

महत्वाचे म्हणजे, नवनाथने ज्या ६ वर्षांच्या मुलाची हत्या केली होती तो मुलगा शीतलचा होता. शीतलने ही कातपूरची राहणारी होती. तिचा विवाह काही दिवसांपूर्वी अंबडमधील एका तरुणासोबत झाला होता. २०२० मध्ये शीतलला भेटण्यासाठी नवनाथ तिच्या सासरी गेला होता. यावेळी प्रेमात अडथळा ठरणाऱ्या शीतलच्या मुलाची नवनाथने हत्या केली होती.

याप्रकरणी शीतल आणि नवनाथ या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली होती. याप्रकरणात शीतलची निर्दोष मुक्तता झाली होती तर नवनाथला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. शीतल ही गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगरमध्ये भाड्याने घर घेऊन राहत होती. अशातच पॅरोलमध्ये सुटून आलेला नवनाथ घरी आला. त्यावेळी शीतल आणि त्याने विष प्राशन करून आयुष्य संपवलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एमआयडीसीत टोळक्याचा तरूणावर कोयत्याने हल्ला; नेमकं काय घडलं

अहिल्यानगर | नगर सह्याद्री एमआयडीसी परिसरात एका टोळयाने तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली...

ढगाळ वातावरण! कांदा उत्पादक चिंतेत; काय होणार परिणाम

श्रीगोंदा | नगर सह्याद्री श्रीगोंदा तालुयामध्ये कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. परंतु  सध्या ढगाळ...

काळजी घ्या! उष्माघाताचे ‘इतके’ रुग्ण; आरोग्य विभागाने दिला हा इशारा

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरी मार्च महिन्याच्या...

चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, अजितदादादांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ, काय म्हणाले पहा

बीड / नगर सह्याद्री - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या वक्तव्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे दोन्ही गट...