spot_img
महाराष्ट्रShilpa Bodkhe : हाताचा मटणाचा वास गेला असेलच.. खरमरीत पत्र लिहीत बड्या...

Shilpa Bodkhe : हाताचा मटणाचा वास गेला असेलच.. खरमरीत पत्र लिहीत बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : लोकसभेच्या निवडणुकीसाठी जवळपास 11 ठिकाणचे उमेदवार निश्चित करून उद्धव ठाकरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. परंतु त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका बसला आहे.

पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांच्या राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. मुंबईच्या कार्यालयात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या मनमानी कारभार करत असून त्यांनी संघटना विस्कळीत केली, तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला त्या किंमत देत नाहीत असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते यांच्या शब्दाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे.

मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्या बद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...