spot_img
महाराष्ट्रShilpa Bodkhe : हाताचा मटणाचा वास गेला असेलच.. खरमरीत पत्र लिहीत बड्या...

Shilpa Bodkhe : हाताचा मटणाचा वास गेला असेलच.. खरमरीत पत्र लिहीत बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : लोकसभेच्या निवडणुकीसाठी जवळपास 11 ठिकाणचे उमेदवार निश्चित करून उद्धव ठाकरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. परंतु त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका बसला आहे.

पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांच्या राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. मुंबईच्या कार्यालयात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या मनमानी कारभार करत असून त्यांनी संघटना विस्कळीत केली, तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला त्या किंमत देत नाहीत असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते यांच्या शब्दाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे.

मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्या बद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘गाडी बाजूला घे’ म्हटल्याचा राग; एसटी बसचालकाला मारहाण, बसवर दगडफेकही

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील पुणेरोड बसस्थानकाजवळील स्वस्तिक चौकात ‘एसटी बस वळवण्यास अडथण होत आहे,...

दारूड्याचा भाऊजीवर सपासप चाकूहल्ला ; कुठे घडला प्रकार पहा

लालटाकी येथे कौटुंबिक वाद विकोपाला; पत्नीलाही बेदम मारहाण अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील लालटाकी भागातील बारस्कर...

प्रस्तापितांचा विरोध पत्करला पण शिवाजीराव कर्डीले यांनी सर्वसामान्यांशी नाळ तुटू दिली नाही, आता अक्षय कर्डीले यांनी…

  आम्ही सर्व अक्षय कर्डिलेंच्या पाठिशी ः प्रा. राम शिंदे/ सहकार सभागृहातील सर्वपक्षीय शोकसभेत स्व....

उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे महाराष्ट्रात पडघम वाजले आहेत....