spot_img
ब्रेकिंगशरद पवारांचा सरकारला ''दे धक्का''; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं...

शरद पवारांचा सरकारला ”दे धक्का”; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं काय…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं होतं. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मतदारांनी चांगली साथ दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्येही शरद पवारांची राष्ट्रवादी कमी जागा लढवूनही निर्णायक भूमिकेत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी कोणाकोणावर भारी पडणार हेच पाहायचं.

लोकसभा निवडणूकीत काँग्रेसनं राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र अवघ्या 10 जागा लढवून 8 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे पवारांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट अधिक होता. विधानसभेतही शरद पवारांच्या पदरी कमी जागा पडल्यात. मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये राष्ट्रवादी नाही असं विधान पवारांनी केलं होतं. खरं तर पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे.

परिणामी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मविआत दुरावा, मतभेद आणि वेगळं समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होतेय. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष निर्णायक भूमिकेत असणार यात नवल नाही.

लोकसभेच्या निकालानंतर ‘महायुती’ सावध झालीये.कल्याणकारी योजनांचे धडाधड निर्णय घेत लोकसभेच्या निकालाचे अपयश पुसण्याचा आटोकाट प्रयत्न महायुतीनं केला.अशात निवडणुकीचा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागणार, हे सांगणे सध्या कठीण आहे.त्यामुळेच निकालानंतर काँग्रेस आणि भाजप वगळता उर्वरित पक्ष हे कोणाशीही ‘युती आणि आघाडी’ करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे पुढील काळात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिकेत राहील, असा अंदाज बांधला जातोय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....