spot_img
अहमदनगरसेनापती बापट पतसंस्था ठेवीदारांना वार्‍यावर सोडणार नाही: माजी आ.औटी

सेनापती बापट पतसंस्था ठेवीदारांना वार्‍यावर सोडणार नाही: माजी आ.औटी

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
सेनापती बापट पतसंस्थेत ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षीत आहेत. मध्यंतरी काही पतसंस्थांबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आणि त्यातून संशयाचे मळभ तयार झाले. दरम्यानच्या काळात कोरोना लाट आली. यातून निश्चितपणे सेनापती बापट पतसंस्था संस्थेचे चेअरमन रामदास भोसले यांच्या माध्यमातून मार्ग काढेल आणि टप्याटप्याने सर्वांच्या ठेवी मिळतील. कर्जदारांनीही यासाठी संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व सेनापती बापत पतसंस्थेचे मार्गदर्शक विजयराव औटी यांनी केले.

सेनापती बापट पतसंस्थेत ठेवीदारांना ठेवी देण्यास उशिर लागत असला तरी प्राधान्यक्रम आणि गरजेनुसार प्रत्येक ठेवीदाराला ठेव देण्यासाठी आम्ही कार्यक्रम आखला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले यांनी सांगितले. तालुक्यात काही पतसंस्था आणि त्यांच्या संचालकांनी गडबड केल्याने त्याचे परिणाम कारण नसताना अन्य पतसंस्थांना भोगावे लागत आहेत. मात्र, हा अडचणीचा काळ नक्कीच जाईल आणि ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळतील.

संस्थेची गुंतवणूक आणि भांडवल मोठे असून त्या अनुषंगाने विचार केला तर संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. संस्थेचे संचालक मंडळ कर्ज वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्नशिल आहे. कर्जदारांनी संस्थेला कर्ज वसुलीकामी सहकार्य चालवले असून त्यांच्या सहकार्यातूनच ठेवीदारांना दिलासा देण्याचे काम होत आहे. संस्थेचे कर्मचारी देखील याअनुषंगाने काम करत असल्याचे रामदास भोसले यांनी सांगितले.दरम्यान, संस्थेच्या कर्मचार्‍यांना आता ठेवीदारांनी सहकार्य करावे आणि संबंधित शाखांमधील गावकरी व कार्यकर्त्यांनी देखील या कामी सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन माजी आमदार विजय औटी यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...