spot_img
मनोरंजनBigg Boss Marathi: संग्राम चौगुले अवघ्या १४ दिवसात 'बिग बॉस' च्या घराबाहेर,...

Bigg Boss Marathi: संग्राम चौगुले अवघ्या १४ दिवसात ‘बिग बॉस’ च्या घराबाहेर, कारण आलं समोर..

spot_img

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’ आता अंतिम टप्प्यात आहे, दोन आठवड्यापूर्वी आलेला संग्राम चौगुले अवघ्या 14 दिवसात घराबाहेर गेला आहे. संग्रामने दोन आठवड्यांपूर्वी घरात प्रवेश केला होता, परंतु कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला विश्रांती घेण्यासाठी घराबाहेर जावे लागले.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या संग्राम चौगुले बाहेर आल्यावर पहिली सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. यात संग्रामने लिहिलं की, “गंभीर दुखापतीमुळे मला बिग बॉस घरातून बाहेर जावं लागलं. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद! पुन्हा आपली भेट लवकर होईल. तुमच्या मिळालेल्या प्रेमामुळे मी लवकर बरा होईन. ” असे म्हटलं आहे.

त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच तो लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बिग बॉस’ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तो घरातील आपली नावाची पाटी घेऊन घराबाहेर पडतो. अनेक सदस्य त्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त करतात. मात्र सध्या अरबाजला वाचवण्यासाठी संग्रामला बाहेर काढल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...