spot_img
अहमदनगरAhmednagar Crime News: विहिरीत उडी घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या! घटनास्थळी दोन चिठ्ठ्या घावल्या...कुठे...

Ahmednagar Crime News: विहिरीत उडी घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या! घटनास्थळी दोन चिठ्ठ्या घावल्या…कुठे घडली घटना?

spot_img

Ahmednagar Crime News: दोन्ही हाताला तसेच गळ्याला दोरी बांधून ८० फूट विहिरीतील पाण्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना पाचेगाव (ता. नेवासा) शिवारात शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. संतराम उर्फ संजय उमाजी मतकर (अंदाजे वय ४५) रा. पाचेगाव असे विहिरीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

संजय मतकर पाचेगाव-गुजरवाडी या रस्त्यावर शेतात घर करून राहत होता. घराच्या काही फुटाच्या अंतराव सकाळच्या दरम्यान घटना घडली. या घटनेची माहिती पाचेगाव, पुनतगाव येथील पोलीस पाटील जय वाकचौरे यांनी पाचेगाव येथील बीट हवालदार यांना फोनद्वारे कळविली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दोन चिठ्ठ्या वेगवेगळ्या अवस्थेत मिळून आल्या. या चिठ्यांत नेमके काय लिहिले आहे ते मात्र समजू शकलेले नाही. पोलिसांनी या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. दरम्यान नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....

‘हुजूर मराठे आ रहे हे’! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला मुंबईकडे कूच करणार

बीड । नगर सहयाद्री  येत्या 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसऱ्या दिवशी...

…हेच माझे राजकारणातील ‘गुरु’!, माजी खासदार सुजय विखे पाटलांचे वक्तव्य चर्चेत

अहिल्यानगर । नगर सहयाद्री गुरुपौर्णिमेनिमित्त माजी खासदार व भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शिर्डी...