spot_img
अहमदनगरसंगमनेरचे राजकीय वातावरण बिघडले; थोरातांचा मंत्री विखेंवर निशाणा, काय म्हणाले पहा

संगमनेरचे राजकीय वातावरण बिघडले; थोरातांचा मंत्री विखेंवर निशाणा, काय म्हणाले पहा

spot_img

संगमनेर | नगर सह्याद्री

तालुक्यात सध्या राजकीय वातावरणात घडत असलेल्या बदलांमुळे एक प्रकारची दहशतीची भावना निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुणाचीही गुलामगिरी स्वीकारू नका. मतभेद विसरून एकत्र या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ताकदीने लढा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीनंतर आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. बाळासाहेब थोरात म्हणाले कारखान्याचे कार्य सहकारमहर्षींच्या शिस्त, पारदर्शकता आणि विचारांवर आधारित आहे. निवडणुकीपूर्वी अफवा पसरल्या, पण सभासदांनी एकमताने निर्णय घेतला आणि तो फुगा फुटला.त्यांनी संगमनेरच्या राजकीय संस्कृतीचं कौतुक करताना बंधूभाव, शिस्त आणि एकतेचा आदर्श मांडला.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक हंगाम नवीन आव्हाने घेऊन येतो आणि काही प्रश्न हे केंद्र सरकारशी निगडित असतात. आपण एकजुटीने त्यांना सामोरे जावे लागेल. संगमनेरची खास राजकीय ओळख अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांवर आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...