spot_img
अहमदनगरसंगमनेरचे राजकीय वातावरण बिघडले; थोरातांचा मंत्री विखेंवर निशाणा, काय म्हणाले पहा

संगमनेरचे राजकीय वातावरण बिघडले; थोरातांचा मंत्री विखेंवर निशाणा, काय म्हणाले पहा

spot_img

संगमनेर | नगर सह्याद्री

तालुक्यात सध्या राजकीय वातावरणात घडत असलेल्या बदलांमुळे एक प्रकारची दहशतीची भावना निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुणाचीही गुलामगिरी स्वीकारू नका. मतभेद विसरून एकत्र या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ताकदीने लढा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीनंतर आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. बाळासाहेब थोरात म्हणाले कारखान्याचे कार्य सहकारमहर्षींच्या शिस्त, पारदर्शकता आणि विचारांवर आधारित आहे. निवडणुकीपूर्वी अफवा पसरल्या, पण सभासदांनी एकमताने निर्णय घेतला आणि तो फुगा फुटला.त्यांनी संगमनेरच्या राजकीय संस्कृतीचं कौतुक करताना बंधूभाव, शिस्त आणि एकतेचा आदर्श मांडला.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक हंगाम नवीन आव्हाने घेऊन येतो आणि काही प्रश्न हे केंद्र सरकारशी निगडित असतात. आपण एकजुटीने त्यांना सामोरे जावे लागेल. संगमनेरची खास राजकीय ओळख अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांवर आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...