spot_img
महाराष्ट्रToday Accident News: साईदर्शनाची ओढ अधुरी राहिली! भीषण अपघात चार ठार, कंटेनर...

Today Accident News: साईदर्शनाची ओढ अधुरी राहिली! भीषण अपघात चार ठार, कंटेनर चालक फरार

spot_img

सोलापूर। नगर सहयाद्री-
साईंच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात होऊन चौघे ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आहेत. बुधवारी (दि. २७) पहाटे करमाळा तालुयातील पांडे गावानजिक कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी तीघांचा जागीच मृत्यू झाला.

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक दगावला आहे. मृत भाविक कर्नाटक राज्यातील आहेत. श्रीशैल चंदेशा कुंभार (वय ५६), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०, रा. गुलबर्गा), ज्योती दिपक हिरेमठ (वय ३८, रा. बागलकोट) यांचा जागीच मृत्यू झाला. शारदा दीपक हिरेमठ (वय ७०, रा. हुबळी) यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाविक साईच्या दर्शनासाठी निघाले होते. करमाळा तालुयातील सालसेकडून तवेरा गाडीने (क्र. केए ३२, एन ०६३१) शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते. कंटेनर (क्र. आरजे ०६ जीसी २४८६) हा फरशी घेऊन करमाळ्याकडून सालसेच्या दिशेने निघाला होता.

पहाटे सहाच्या सुमारास पांडे गावच्या पुलाजवळील वळणावर या वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. जोराचा आवाज झाल्याने पांडे गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. या अपघातात आठ महिन्यांचा चिमुकला सुखरूप बचावला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...