spot_img
अहमदनगरAhmednaga: दोन दिवस संत्ततधार!! कांदा पिकाचे 'मोठे' नुकसान...

Ahmednaga: दोन दिवस संत्ततधार!! कांदा पिकाचे ‘मोठे’ नुकसान…

spot_img

सुपा /शरद रसाळ
मंगळवार व बुधवार सलग दोन पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात संततधार पाऊस पडल्याने जनजीवन ठप्प झाले असून कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जानेवारी महिन्यात गहू ज्वारी ही पिके दाणा भरणीत आसतात तर काही कांदा पिके काढनीला असतात अशात दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणा नंतर मंगळवारी व बुधवारी सकाळी सुपा परिसरा सह पारनेर तालुक्यातील अनेक गावात पावसास सुरुवात झाली. शेतातील जे पिके पाण्यावर आहेत त्यांना हा पाऊस फलदायी असला तरी काढणीला आलेल्या पिकांना हा पाऊस त्रास दायक आहे.

जानेवारीत पडणारा हा अवकाळी पाऊस काही शेतमालाला फलदायी असला तरी काही पिकांना मात्र मारक आहे. या पावसानंतर भाजीपाला पिके, फुल शेती व नगदी पिकाचे मोठे नुकसान होईल, त्यातच थोडेफार वादळ आले तर ज्वारी पिक सपाट होण्यास वेळ लागणार नाही. पाऊस लांबला किंवा सुर्यदर्शन नाही झाले तर पिकांचे अस्तित्व धोक्यात येईल यात मात्र शंका नाही.

बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने सुपा येथील आठवडे बाजारात खरेदी व विक्री करणारांची एकच धांदल उडाली होती. पावसामुळे शाळकरी मुलांसह पालकांची शिक्षकांचीही चांगलीच धावपळ उडवली. तर काढणीला आलेला कांदा सलग दोन दिवस शेतातच भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...