spot_img
देशरोहितच्या अर्धशतकानं रचला पाया, गिल-जुरेलने चढवला विजयी कळस

रोहितच्या अर्धशतकानं रचला पाया, गिल-जुरेलने चढवला विजयी कळस

spot_img

नवी दिल्ली | वृत्तसंस्था
भारत – इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना रांचीमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने विजय मिळवला. दरम्यान या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने मिळून ४० धावा जोडल्या. रोहित शर्मा २४ तर यशस्वी जयस्वाल १६ धावांवर नाबाद परतला. चौथ्या दिवशी दोघांनी चांगली सुरुवात केली.

मात्र यशस्वी जयस्वालच्या रुपात भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला. अर्धशतक झळकावल्यानंतर रोहितनेही पॅव्हेलियनची वाट धरली. त्यानंतर भारतीय डाव गडगडल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मानंतर रजत पाटिदारही परतला. गिल आणि जडेजाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जडेजा बाद होताच सरफराज खानही खात न खोलता परतल्याने टीम इंडियावर दडपणही आले. मात्र उर्वरित खेळाडूंनी डाव सावरत विजय संपादन केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...