spot_img
देशरोहितच्या अर्धशतकानं रचला पाया, गिल-जुरेलने चढवला विजयी कळस

रोहितच्या अर्धशतकानं रचला पाया, गिल-जुरेलने चढवला विजयी कळस

spot_img

नवी दिल्ली | वृत्तसंस्था
भारत – इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना रांचीमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने विजय मिळवला. दरम्यान या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने मिळून ४० धावा जोडल्या. रोहित शर्मा २४ तर यशस्वी जयस्वाल १६ धावांवर नाबाद परतला. चौथ्या दिवशी दोघांनी चांगली सुरुवात केली.

मात्र यशस्वी जयस्वालच्या रुपात भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला. अर्धशतक झळकावल्यानंतर रोहितनेही पॅव्हेलियनची वाट धरली. त्यानंतर भारतीय डाव गडगडल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मानंतर रजत पाटिदारही परतला. गिल आणि जडेजाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जडेजा बाद होताच सरफराज खानही खात न खोलता परतल्याने टीम इंडियावर दडपणही आले. मात्र उर्वरित खेळाडूंनी डाव सावरत विजय संपादन केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...