spot_img
देशरोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड ! दिग्गजांचा विक्रम मोडला , पहा काय केले

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड ! दिग्गजांचा विक्रम मोडला , पहा काय केले

spot_img

नगर सह्याद्री टीम : सध्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरू आहे. भारत अद्याप एकही मॅच हरलेले नाही. दरम्यान नेदरलँड्सविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माने आक्रमक अंदाजात टीम इंडियाला सुरुवात करून दिली. व ७व्या षटकात षटकार ठोकत अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

वन डे वर्ल्ड कपच्या एका आवृत्तीत भारतीय कर्णधाराने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर आहे. त्याने २००३ मध्ये ११ सामन्यांत ४६५ धावा केल्या होत्या. रोहितच्या नावावर ४४२ धावा असून गांगुलीला मागे टाकण्यासाठी त्याला आणखी २४ धावांची गरज होती आणि त्याने तोही विक्रम मोडला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सलामीवीर म्हणून १४ हजार धावांचा टप्पाही त्याने आज ओलांडला. त्याच्यापुढे आता फक्त 15758 – वीरेंद्र सेहवाग 15335 – सचिन तेंडुलकर हे दोघे आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वाधिक २३ षटकारांचा विक्रमही रोहितने या वर्ल्ड कपमध्ये नोंदवला आणि २०१९मध्ये इयॉन मॉर्गनचा २२ षटकारांचा विक्रम त्याने मोडला.

रोहितने २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या २४ वन डे सामन्यांमध्ये एकूण ५८ षटकार मारले आहेत आणि आजच्या सामन्यात त्याने १ षटकार खेचून एका कॅलेंडर वर्षात वन डेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर केला. त्याने एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला. एबीनने २०१५ मध्ये २० वन डेमध्ये ५८ षटकार मारले होते आणि रोहितने २०२३ मध्ये ५८ षटकार खेचले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....