spot_img
अहमदनगरअण्णा हजारेंना रोहित पवारांचे उत्तर, म्हणाले...

अण्णा हजारेंना रोहित पवारांचे उत्तर, म्हणाले…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लक्ष केले होते. त्यावर अण्णा हजारे यांनी १०-१२ वर्षांनी जाग आली असल्याचे सांगत माझ्यामुळे तुमचे काही मंत्री घरी गेले होते असे म्हटले होते. त्यावर आता यामध्ये उडी घेत अण्णा हजारे यांना टोला लगावला आहे.

स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब झाले, असं वक्तव्य करत रोहित पवार यांनी अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अण्णा हजारेंनी पवारांवर केलेल्या टीकेवर बोलताना रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांशी खेळणे योग्य नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी पुढे असेही म्हटले, २०१४ पूर्वी प्रत्येक विषयावर आंदोलन करणारे, प्रतिक्रिया देणारे तथाकथित स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर मात्र एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना शांतच राहिले नाहीतर गायब झालेत. शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अण्ण हजारेंना लक्ष्य केलं होते. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, शरद पवार यांना १०-१२ वर्षांनी जाग आली आहे. त्यांना अचानक जाग कशी आली मला माहिती नाही.

त्यावेळी मी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते, कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली, असं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी दिलं होतं. रोहित पवार यांनी आता अण्णा हजारे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यावर राज्यभरात टिकेची झोंड उठली आहे. आता अण्णा हजारे काय बोलता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...