spot_img
अहमदनगररिक्षाचालकांना खुशखबर आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश; 'तो' दंड होणार पूर्ण...

रिक्षाचालकांना खुशखबर आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश; ‘तो’ दंड होणार पूर्ण माफ

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
राज्यातील रिक्षा टॅसी मालवाहतूक वाहन चालकांनी आपल्या वाहनाचा परवाना शुल्क वेळेत न भरल्यास त्यांना प्रतिदिन ५० रुपयांचा दंड लावण्यात येत होता. तो मागे घ्यावा अशी रिक्षाचालकांची मागणी होती. यासाठी आमदार संग्राम जगताप यांंनी पाठपुरावा केल्यानंतर दंड पूर्णपणे माफ करण्यात आला आहे.

रिक्षाचालकांना केला जाणारा ५० रुपयांचा दंड मागे घ्यावा या मागणीसाठी राज्यातील विविध रिक्षा संघटनांनी जिल्हा स्तरावर आंदोलने केली होती. याच पार्श्वभूमीवर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रिक्षा चालकांचा प्रश्न मांडला होता. त्या पार्श्वभूमीवर गेल्या २८ तारखेला परिवहन सचिव व आयुक्त तसेच अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली.

रिक्षाचालक सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांची उपजीविका रिक्षावरच अवलंबून आहे. प्रतिदिन ५० रुपये दंड भरणे म्हणजे रिक्षा टॅसी मालवाहतूक चालकांसाठी हे अन्यायकारक आहे. याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी मांडलेल्या प्रश्नाला यश आले.

मंत्रिमंडळात विषय मांडला असून राज्यमंत्री दादा भुसे यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर याबाबत हा ५० रुपयांचा दंड पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय झाला अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

रिक्षा संयुक्त फेडरेशनच्यावतीने स्वागत
ऑटो रिक्षा फिटनेस दंड शासनाने स्थगित केला या निर्णयाचे जिल्हा ऑटो रिक्षा संयुक्त फेडरेशनच्यावतीने माळीवाडा बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे स्वागत करुन फाटाके फोडण्यात आले. याप्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश घुले, वैभव जगताप, विलास कराळे, दत्ता वामन, बबनराव बारस्कर, समीर कुरेशी, भैय्या पठाण, अशोक चोभे, अशोक औशिकर, लतिफ शेख, बाबा दस्तगिर, बापू दारकुंडे, विष्णू आंबेकर, रवीकिरण वाघ, नासिर खान, किशोर कुलट, अन्वर शेख, सुधाकर साळवे, फैरोज शेख, विजय शेलार, अभय पतंगे आदी उपिस्थत होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला निवडणुकीचा प्लान!, युती होणार नाही, त्या..

Maharashtra politics: चार महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे कोर्टाने आदेश...

अर्बन बँक घोटाळा प्रकरण: पुन्हा महत्वाची अपडेट,आरोपींवर कारवाई करा! मुख्यमंत्र्यांनाकडे कोणी केली मागणी? पहा..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - नगर अर्बन (मल्टीस्टेट) को-ऑप. बँक (अहमदनगर) अहिल्यानगर ही नगर जिल्ह्यातील...

‘अहिल्यानगर मनपा आरोग्यात राज्यात पाचव्या क्रमांकावर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणाऱ्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय...

अवकाळी पावसाचा वीटभट्टी व्यवसायाला फटका! नुकसानभरपाईपासून व्यावसाईक वंचित वीटभट्टी व्यवसायिकांचेही मोठे नुकसान मागणी

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील वडगाव सावताळ, वासुंदे, खडकवाडी, कासारे, वनकुटे,...