spot_img
ब्रेकिंग११ वर्षांनी लागला निकाल! डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कुणाला झाली जन्मठेप? पहा..

११ वर्षांनी लागला निकाल! डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कुणाला झाली जन्मठेप? पहा..

spot_img

पुणे । नगर स सहयाद्री
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. पाचपैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी विरेंद्र तावडे, ऍड संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची न्यायालयानं पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. दाभोलकर यांची २०१३ मध्ये पुण्यात हत्या झाली होती. त्यांच्या हत्येला पावणे अकरा वर्ष उलटली आहेत.

२० ऑगस्ट २०१३ रोजी अंनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ओमकारेश्वर पुलावर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. सचिन अंदुरे, शरद कळसकर या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या.

दोन्ही हल्लेखोरांना न्यायालयानं दोषी धरलं आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.डॉ. विरेंद्र तावडे, ऍड संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांवर दाभोलकरांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. पण त्यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्या विरोधात पुरावे नसल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं. त्यामुळे दाभोलकर हत्या प्रकरणात हल्लेखोरांना शिक्षा झाली आहे. पण कट रचल्याचा आरोप असणार्‍या तिघांची सुटका झाली आहे.

दाभोलकरांच्या हत्येला नऊ वर्षे उलटल्यानंतर १५ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्याच्या विशेष न्यायालयाने डॉ. विरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर आरोप निश्चित केले. या पाचही आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. त्यामुळे विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली.

न्यायाधीश नावंदर यांच्या बदलीनंतर विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली.या खटल्यात सीबीआय’तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी २० साक्षीदारांची साक्ष नोंदवली. तर बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर, अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अ‍ॅड. सुवर्णा आव्हाड यांनी दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवत सरकार पक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी नोंदवली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खळबळजनक! कर्जाच्या वाद पेटला, पुढे नको तोच प्रकार घडला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कर्जाच्या वादातून तिघा जणांनी एका युवकावर काठी व दगडाने हल्ला केल्याची...

बाजारपेठेतील पार्किंगची समस्या सुटणार!,आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली महत्वाची माहिती..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सर्जेपुरा येथील महानगरपालिकेचे रंगभवन व्यापारी संकुल पाडून त्याजागी व्यापारी संकुल, सांस्कृतिक...

विराटचा कसोटी क्रिकेटला रामराम!, चाहत्यांना मोठा धक्का

नवी दिल्ली | वृत्तसंस्था गेल्या आठवड्याभरात भारतीय क्रिकेट चाहत्यांना दोन मोठे धक्के बसले आहेत. भारतीय...

शेतकऱ्यांच्या मागणीला यश! सुजित झावरे पाटील म्हणाले, ‘ती’ चळवळ अविरत चालू ठेवणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका हा दुष्काळी भाग म्हणून राज्यात ओळखला जातो परंतु...