spot_img
ब्रेकिंग'शाळा परिसरातून पान टपऱ्यांच्या जोडीने एनर्जी ड्रिंक हटवा'; कोणी केली मागणी?,वाचा..

‘शाळा परिसरातून पान टपऱ्यांच्या जोडीने एनर्जी ड्रिंक हटवा’; कोणी केली मागणी?,वाचा..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राज्य शासनाने शाळांसाठी जाहीर केलेल्या नवीन नियमावलीनुसार आता शाळेपासून 1 किलोमीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकले जाणाऱ्या पानटपऱ्या नसाव्यात, असे आदेशित केले आहे. मात्र, पानटपऱ्यांसह शाळांच्या परिसरात विकले जाणारे घातक असे एनज ड्रिंक देखील हटवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.

हेरंब कुलकण यांनी याबाबत म्हटले आहे की, शासनाच्या या निर्णयाचे आपण स्वागत करतो. कारण दीड वर्षापूव शाळेशेजारी असलेली पानटपरी हटवली म्हणून आपणावर सुपारी देऊन प्राणघातक हल्ला झाला होता. या निर्णयाने माझे सांडलेले रक्त कारणी लागले, असे कुलकण यांनी म्हटले आहे.

फक्त याची अंमलबजावणी करताना शाळेच्या मुख्याध्यापकांसोबतच त्या गावातील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका व पोलिस यांच्यावरही जबाबदारी निश्चित करावी. 15 जूनला शाळा सुरू होण्यापूव प्रशासनाने शाळेभोवती असलेल्या या सर्व टपऱ्या काढून द्याव्यात असेही हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...