spot_img
देशLok Sabha Election: राज ठाकरेंची दिल्लीत एंट्री! महायुतीला आता इंजिन जोडलं जाण्याची...

Lok Sabha Election: राज ठाकरेंची दिल्लीत एंट्री! महायुतीला आता इंजिन जोडलं जाण्याची शक्यता?

spot_img

Lok Sabha Election: भाजप आणि मनसेच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः दिल्लीला दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसह आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीवरही फैसला होईल. विशेष म्हणजे भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीसाठी फडणवीसही दिल्लीत दाखल झालेत. त्यामुळे भाजप-मनसे युतीसह मनसेला महायुतीत घेण्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.

मनसेला सोबत घेण्यासाठी काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील लोकसभेची १ जागा देऊन आणि इतर बादाघाटी करून मनसेला सोबत घेण्यावर भाजपची चर्चा सुरू आहे. दक्षिण मुंबईची जागा मनसेला देऊन त्यांना महायुतीत घेण्यावर शिक्कामोर्तब होईल. दक्षिण मुंबईत सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार असून मनसेकडून बाळा नांदगावकर महायुतीचे उमेदवार असू शकतात.

राज ठाकरे यांची अमित शहा यांच्यासमवेत बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विशेष विमानाने काल दिल्लीला ९.४० वाजेच्या दरम्यान दाखल झालेत. राज ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरेही आहेत. विशेष म्हणजेच गेल्या ३-४ दिवसांतला राज ठाकरेंचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे, केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात होत आहे. या बैठकीत राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र येथील जागावाटपांचा निर्णय होणार आहे. महाराष्ट्रातील जागावाटपांचा तिढा सोडवण्यात येणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...