spot_img
ब्रेकिंगमहायुती नवा डाव टकाकणार! मध्यरात्री बैठक; विधानसभेचा जाहीरनामा ठरला? ‘या’ प्रश्नांना देणार...

महायुती नवा डाव टकाकणार! मध्यरात्री बैठक; विधानसभेचा जाहीरनामा ठरला? ‘या’ प्रश्नांना देणार प्राधान्य..

spot_img

Politics News: लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याचा दौरा करून गेल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते अलर्ट मोडमध्ये गेले आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी शनिवारी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. दीड ते दोन तास चाललेल्या बैठकीत जागावाटपावर आणि महायुतीच्या जाहीरनाम्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. जाहीरनाम्यात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

आगामी निवडणुकीतील अडचणींच्या उपाययोजना आणि तिन्ही पक्षांच्या संभाव्य मताधिक्याबाबत देखील विचारविनिमय झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात या बाबीवर चर्चा झाली होती.

त्यानुसार, भाजप १५० ते १६० जागांवर, शिवसेना ८० ते ९० जागांवर आणि अजित पवार गट ४५ ते ५० जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या फॉर्म्युल्यात कोणतेही बदल होणार का, हे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीही विधानसभेसाठी जोरदार तयारीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोण गुलाल उधळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...