spot_img
राजकारणश्रीराम मंदिरावरून राजकारण ! रामललाची मूळ जन्मभूमी वेगळीच? मंदिर दुसऱ्याच ठिकाणी होतेय?...

श्रीराम मंदिरावरून राजकारण ! रामललाची मूळ जन्मभूमी वेगळीच? मंदिर दुसऱ्याच ठिकाणी होतेय? गंभीर आरोपींना योगींचे उत्तर

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : २२ तारखेला श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे सध्या त्याची जोरदार तयारी सुरु असून देशभरातील दिग्गज, मान्यवर या सोहळ्याला असतील. दरम्यान या उत्सवावरून राजकारणच चांगलेच तापले असताना भाजपावाल्यांनी राम मंदिराची जागा बदलली.

रामललाची मूळ जन्मभूमी ही बाबरी मशीद परिसर आहे. मात्र, आताचे राम मंदिर हे मूळ जागी बांधले जात नाही, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांच्या या आरोपाला योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा उल्लेख करत योगी आदित्यनाथ यांनी थेट विचारणा केली आहे.

विरोधकांकडून केले जात असलेले दावे आणि आरोप चुकीचे आहेत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे स्वतः अयोध्येला दर्शनासाठी आले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अयोध्येला आले होते, तेव्हा त्यांनी आपला अमूल्य सल्ला का दिला नाही, असा प्रतिप्रश्न योगी आदित्यनाथ यांनी केला.

दरम्यान, अयोध्येनंतर आता काशी आणि मथुरा या ठिकाणी भाजपा आपले वचन पूर्ण करणार का, असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना करण्यात आला होता. यावर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी सविस्तर उत्तर दिले. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. राम मंदिरासाठी ५०० वर्ष संघर्ष केला आहे. संयमित पद्धतीने आम्ही न्यायालयीन लढाई लढून विजय मिळवला आणि त्यानंतरच आता रामलला प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. न्यायालयाच्या माध्यमातून अन्य ठिकाणचे मुद्देही सोडवले जातील. प्रभू श्रीकृष्णांची इच्छा असेल, तेव्हा तारखाही येतील आणि न्यायही मिळेल, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...