spot_img
महाराष्ट्रराजकारण तापले : ४ जूननंतर मुख्यमंत्री तडीपार होणार? कोणी केला दावा पहा

राजकारण तापले : ४ जूननंतर मुख्यमंत्री तडीपार होणार? कोणी केला दावा पहा

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान ७ मेला पार पडले. तर ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अशात राज्यात सर्व पक्षातील नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप होतांना दिसत आहे. त्याचसोबतच राज्याच्या राजकारणात अनेक नवीन मुद्यांची भर पडली आहे. काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा मु्द्या सध्या ऐरणीवर आहे. तर भाजपने नवनवीन मुद्यांवर काँग्रेसाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

अशातच महाविकास आघाडीतील नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. चार जून नंतर मुख्यमंत्री एकतर तडीपार होतील किंवा जेलमध्ये जाती असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते  राऊत यांनी  भाजपसह मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा टीका केली आहे.

देशात मोदी हे प्रचाराच्या नावाखाली धुडगूस घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही. मोदींची तब्येत ठीक नाही, त्यांची गाडी रूळावरून घसरलेली आहे. अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ४ जूनपर्यंत काय तांडव करायचा आहे ते करू देत. आणि शिंदेंनी भ्रष्टाचारावर बोलावे, स्वतःच्या भ्रष्टाचारामुळे ते गळपटले होते. आता ४ जूननंतर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील, असा दावा राऊतांनी केला आहे. त्यांचा या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा राजकारण तापले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...