spot_img
अहमदनगरपारनेर तालुक्यात राजकीय भूकंप? 'यांनी' सोडली आमदार लंके यांची साथ

पारनेर तालुक्यात राजकीय भूकंप? ‘यांनी’ सोडली आमदार लंके यांची साथ

spot_img

सुपा | नगर सह्याद्री
आमदार नीलेश लंके यांनी आपल्या पदाचा राजीनामा २९ मार्च रोजी झालेल्या सुपा येथील मेळाव्यात देताच तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहे. आमदार लंके यांचे कट्टर समर्थक पाडळी रांजणगावचे सरपंचविक्रमसिंह कळमकर व शिरपूरचे सरपंच भास्कर उचाळे यांनी देखील लंके यांची साथ सोडत अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यात राजकीय भूकंप झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रांताध्यक्ष खा सुनील तटकरे, नगर दक्षिण जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, अहमदनगर जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, जेष्ठ नेते मधुकरराव उचाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी पाडळी रांजणगाव येथील सरपंच विक्रमसिहं कळमकर यांची तर युवक तालुका अध्यक्ष म्हणून शिरापुरचे सरपंच भास्कर उचाळे यांची नियुक्ती केली.

यावेळी अजित पवार यांनी १ तासाचा वेळ देत पारनेर येथून गेलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत पारनेर तालुक्यातील राजकीय स्थितीबाबत कळमकर यांच्याकडून आढावा घेतला. नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विक्रमसिहं कळमकर,युवक तालुका अध्यक्ष भास्कर शिरोळे यांच्या निवडीचे आमदार संग्राम जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत दादा गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तालुक्याचे ज्येष्ठ नेते मधुकर उचाळे मा. नगराध्यक्ष विजय औटी, यांनी अभिनंदन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....