spot_img
अहमदनगर४० टक्के कामाचे ९० टक्के बिल अदा! पाण्याची टाकी चोरी गेल्याची तक्रार,...

४० टक्के कामाचे ९० टक्के बिल अदा! पाण्याची टाकी चोरी गेल्याची तक्रार, ‘या’ गावातील नेमकं प्रकरण काय?

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील वडगाव सावताळ येथील सुमारे एक कोटी ९१ लाख रूपयांच्या जलजीवन योजनेचे फक्त ४० टक्के काम झाले आहे. मात्र या योजणेचे एक कोटी ८० लाख रूपये म्हणजे सुमारे ९० टक्के पैसे ठेकेदारास वर्ग करण्यात आले आहेत. अद्यापही या पाणी योजनेच्या अनेक वस्त्यांवरील जलवाहिनी तसेच पाण्याची टाकी व इतर अशी कामे करणे बाकी आहे. या बाबत महादू बन्शी रोकडे व ग्रामस्थ यांनी औरंगाबाद खंडपिठात जनहित याचिका सादर केली होती. आता १० एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने मुख्यकार्यकारी अधिकारी व ठेकेदार व इतर ११ जणांना आपले म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे.

जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत वडगाव सावताळ गावासाठी एक कोटी ९१ लाख रूपयांच्या योजणेचे काम सुरू आहे. या योजणेतील वितरण व्यवस्थेमधील जलवाहिणीचे वाडी वस्त्यांवरील कामे पुर्ण झालेली नाहीत. अनेक ठिकाणी खोदाई केली मात्र पाईप टाकले नाहीत. तसेच १० ते १२ वाड्या वस्त्यांसाठी चार जलकुंभ आहेत मात्र फक्त दोनच जुलकुंभाची कामे पुर्ण झाले आहेत. तसेच दोन हजार ६५० मीटर लोखंडी पाईप न टाकता ठेकेदाराने त्याचे बील मात्र काढले आहे. या पुर्वीचीही गावात सुमारे तीन कोटी रूपयांची भारत निर्माणची ग्रामिण पाणी फक्त कागदोपत्री पुर्ण झाली आहे.

त्या योजणेचे पाणी गावाला पिण्यास मिळाले नाही. आताही ही नव्याने होत असलेल्या पाणी योजणेचे पाणी गावाला पिण्यास मिळणार नसल्याने रोकडे यांनी ग्रामस्थांकडून लोकवर्गणी करत अ‍ॅड. संदीप आंधळे यांचे मार्फत ४ मार्चला उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या जनहित याचिकेच्या दोन सुनावण्या झाल्या असून आता १० एप्रील रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी ठेकेदार व इतर ११ जनांना आपले म्हणणे मांडण्याच्या नोटीसा न्यायालयाने बजाविल्या आहेत.

वडगाव सावताळ गावाच्या पाणी योजनेसाठी सुमारे पाच कोटी रूपयांचा खर्च करूणही ग्रामस्थांना पिण्यास पाणी मिळणार नाही या भावनेतून आम्ही जनहित याचिका दाखल केली आहे. या पुर्वी आम्ही संबधीत योजणेचे अधिकारी तसेच जिल्हा परीषदेकडे तक्रार करूनही जिल्हा परिषदेने दखल घेतली नाही म्हणून आम्ही उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
– महादू रोकडे ( याचिकाकर्ता)

पाणी टाकी गेली चोरीला
उच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामसेवक, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याचिकेत नमूद केले की, अधिका-यांना हाताशी धरूण ९० टक्के कामाचे पैसे अदा केले आहेत. प्रत्यक्षात ५० टक्केही काम पूर्ण झालेले नाही. या पुर्वी याचिकाकर्ते रोकडे यांनी ग्रामस्थांसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची टाकी चोरीला गेल्याचीही तक्रार केली होती.

राजकीय हेतूने ग्रामपंचायत बदनामीचे षडयंत्र
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत वडगाव सावताळ येथील साळुंखे झाप येथे ३० हजार लिटर पाण्याची टाकी बांधण्यात येणार होती. परंतु या टाकीचा फायदा फक्त आठ ते दहा घरांना होणार होता. त्यामुळे सर्व शासकीय परवानगी घेऊन तरटी फाटा येथे ही टाकी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा जवळपास ४० ते ५० घरांना होणार आहे. तर दुसरीकडे ज्याप्रमाणे काम झालेले आहे त्याप्रमाणे मूल्यांकन करून या पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला बिल अदा करण्यात आलेली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतची पदाधिकार्‍यांची बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे.
– सरपंच , संजय रोकडे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! 3 जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा तर ‘या’ सात जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसणार

Maharashtra Weather: राज्यात हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट तर काही...

अहिल्यानगर: महिला वनरक्षकावर हल्ला; फॉरेस्ट परिसरात काय घडलं?, धक्कादायक कारण समोर…

Crime News : देहरे (ता. अहिल्यानगर) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 171...

आजचे राशी भविष्य! तुमच्या नशिबात काय?, वाचा सविस्तर

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही...

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...