spot_img
ब्रेकिंगऊफ ये गर्मी! हवामान विभागाची मोठी माहिती समोर..? 'या' भागात उष्णतेचा कहर

ऊफ ये गर्मी! हवामान विभागाची मोठी माहिती समोर..? ‘या’ भागात उष्णतेचा कहर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून देशातील वातावरणात सातत्याने बदल पहावयास मिळत आहे. कुठं अवकाळी पावसाची दमदार सलामी तर कठे उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान खात्याने २० एप्रिलपर्यंत देशातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, १९ एप्रिल ते २१ एप्रिल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. ओडिशातील काही भागातील तापमान ४५ अंशावर जाण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

तसेच ओडिसा, पश्चिम बंगाल, कोकण, सौराष्ट्र आणि कच्छ, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, ओडिशा या राज्यातील काही भागात येत्या पाच दिवसांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात देखील दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. कुठं उष्णतेचा कहर, तर कुठं अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. दरम्यान, 20 तारखेपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार’; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती..

पुणे । नगर सहयाद्री:- राज्यातील जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती...

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...