spot_img
अहमदनगरAhmednagar: कांदा निर्यात बंदी! खासदार विखे पाटील केंद्रीय मंत्री शाह यांच्याशी चर्चा...

Ahmednagar: कांदा निर्यात बंदी! खासदार विखे पाटील केंद्रीय मंत्री शाह यांच्याशी चर्चा करणार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींसह दिल्ली येथे अमित शाह यांना मी भेटणार आहेत. कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यासाबाबत चर्चा करणार आहे.

कांद्याचा भाव स्थिर होण्यासाठी एक मासिक कोटा निश्चित करून कांद्याला हमी भाव मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे खा.डॉ.सुजय विखे यांनी स्पष्ट केले. नगर तालुयातील उदरमल येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, राजेंद्र तोरडमल, देविदास आव्हाड आदी उपस्थित होते.

कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून याचा मोठा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. यातून शेतकर्‍यांना दिलासा मिळावा यासाठी ही भेट घेतली जाणार आहे. निश्चितच शेतकरी हिताचा विचार केला जाईल असे खा. सुजय विखेंनी यावेळी स्पष्ट केले. त्यांनी महाविकास आघाडीवरही घणाघात केला.

ते म्हणाले, मागील दीड वर्षाच्या काळात महायुतीचे सरकार नव्हते तेव्हा मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता भासत होती. परंतु आता महायुतीचे सरकार आल्यापासून अहमदनगर जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडत नाही. यापुढेही विविध विकासकामांना प्राधान्य देऊन भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...