spot_img
मनोरंजनघटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक थेट अंगठी दाखवत म्हणाला, लग्न…

घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक थेट अंगठी दाखवत म्हणाला, लग्न…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी मीडिया आणि सोशल मीडियावर खळबळ उडवली होती. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या संबंधांमध्ये तणाव आहे असा दावा देखील केला जात होता, मात्र चर्चांना अभिषेक बच्चनने पूर्णविराम दिला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने स्वत: अंगठी दाखवत सांगितले की “आम्ही अजूनही एकमेकांसोबत आहोत. आमच्या घटस्फोटाच्या चर्चा विनाकारण माध्यमांमध्ये केल्या जात आहे. मला याविषयी काहीही बोलायचे नाही.

या सर्व गोष्टी प्रमाणाबाहेर विचित्र पद्धतीने सांगितल्या जात असल्यामुळे हे खूप वाईट आहे. तुम्ही हे का करत आहेत ? हे सुद्धा मला कळतंय. तुम्हालाही बातम्या कराव्या लागतात, पण ठिक आहे. त्यातल्या त्यात आम्ही सेलिब्रिटी आहोत, तर आम्हाला यासर्व गोष्टींना सामोरं जावं लागतंच.” असे सांगीतले आहे.

अनंत अंबानीच्या लग्नात अभिषेक बच्चन, जया बच्चन, अमिताभ बच्चन, श्वेता नंदा एकत्र आले होते, तर ऐश्वर्या आणि तिची मुलगी वेगळी आली होती. तेव्हापासूनच या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुरूवात झाली होती. २००७ मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांचे थाटामाटामध्ये विवाहसोहळा पार पडला. यानंतर २०११ मध्ये या जोडप्याने लेक आराध्याला जन्म दिला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद...

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली...

इंस्टाग्रामची चॅटींग ११ तोळ्यांला भोवली! मेकॅनिक रेहानने नेमकं काय केलं? अहमदनगर मधील घटना

अहमदनगर । नगर सहयाद्री:- सोशल मीडियावर केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार? तुमची रास काय? वाचा..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा...