spot_img
मनोरंजनघटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक थेट अंगठी दाखवत म्हणाला, लग्न…

घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक थेट अंगठी दाखवत म्हणाला, लग्न…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी मीडिया आणि सोशल मीडियावर खळबळ उडवली होती. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या संबंधांमध्ये तणाव आहे असा दावा देखील केला जात होता, मात्र चर्चांना अभिषेक बच्चनने पूर्णविराम दिला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने स्वत: अंगठी दाखवत सांगितले की “आम्ही अजूनही एकमेकांसोबत आहोत. आमच्या घटस्फोटाच्या चर्चा विनाकारण माध्यमांमध्ये केल्या जात आहे. मला याविषयी काहीही बोलायचे नाही.

या सर्व गोष्टी प्रमाणाबाहेर विचित्र पद्धतीने सांगितल्या जात असल्यामुळे हे खूप वाईट आहे. तुम्ही हे का करत आहेत ? हे सुद्धा मला कळतंय. तुम्हालाही बातम्या कराव्या लागतात, पण ठिक आहे. त्यातल्या त्यात आम्ही सेलिब्रिटी आहोत, तर आम्हाला यासर्व गोष्टींना सामोरं जावं लागतंच.” असे सांगीतले आहे.

अनंत अंबानीच्या लग्नात अभिषेक बच्चन, जया बच्चन, अमिताभ बच्चन, श्वेता नंदा एकत्र आले होते, तर ऐश्वर्या आणि तिची मुलगी वेगळी आली होती. तेव्हापासूनच या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुरूवात झाली होती. २००७ मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांचे थाटामाटामध्ये विवाहसोहळा पार पडला. यानंतर २०११ मध्ये या जोडप्याने लेक आराध्याला जन्म दिला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“‘मत चोरी’तून सत्तेत आलेल्या सरकारची ‘जमीन चोरी’ ; राहुल गांधींचा मोदी, फडणवीसांवर निशाणा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे पार्थ पवार आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले...

पतीच्या अपहरणाचा कट; पोलिसांनी केला भांडाफोड, फिर्यादीच निघाला आरोपी..

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री ​भलत्याच व्यक्तींना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या पतीच्या अपहरणाचा खोटा...

खळबळजनक! हत्येच्या कटात मुंडेंचा हात; मुंडे म्हणाले त्यांची आणि माझी

बीड / नगर सह्याद्री : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा...

नगरमध्ये तरुणाच्या घरासमोर तिघांचा पहाटे राडा, मोटारसायकलींची तोडफोड, काय घडलं पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ​"तो जर आम्हांला दिसला तर आम्ही त्याला जिवे ठार...