spot_img
अहमदनगरओंकार ग्रुप तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी; उद्योगपती बोत्रे पाटील यांनी...

ओंकार ग्रुप तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी; उद्योगपती बोत्रे पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी..

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री 
साखर उद्योगात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योगपती बाबुराव बोत्रे पाटील यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श पुन्हा एकदा सिध्द केला आहे. ओंकार ग्रुपतर्फे पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल एक कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही मदत ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, संचालिका रेखा बोत्रे पाटील आणि संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्त केली.

यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार संभाजीराव निलंगेकर आणि यामिनी पाटील यांचाही प्रमुख सहभाग होता. याप्रसंगी बाबुराव बोत्रे पाटील यांनी सांगितले, शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. मात्र अतिवृष्टीमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने मदतीचा हात पुढे केला असून या उपक्रमात ओंकार ग्रुपचा सहभाग राहावा ही आमची भावना आहे.

पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा प्रगतीचा दीपोत्सव उजळावा, या उद्देशाने आम्ही कर्तव्य पार पाडले. ओंकार ग्रुपने शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विकासासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवत दिलेली ही मदत ओंकार ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आंदोलकांवरील ११ गुन्हे मागे घेण्यास मान्यता, न्यायालयीन प्रक्रिया सुरू

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान नगर जिल्ह्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी...

नगर हादरले! धाकट्या भावाने केला मोठ्या भावावर वार; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- स्टेशन रोडवरील न्यू बेथेल कॉलनीत कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत असलेल्या...

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; आमदार शिवाजीराव कर्डिले यांची मोठी माहिती, वाचा पत्रकार परिषद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरघोस निधी देण्यात...

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करा; ठाकरे गटाची मागणी, तहसीलदारांना निवेदन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या, घरे व पशुधनाच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने...