spot_img
महाराष्ट्रमला उमेदवारीची ऑफर, पण..! नाना पाटेकर यांनी स्पष्ट शब्दात मांडलं मत

मला उमेदवारीची ऑफर, पण..! नाना पाटेकर यांनी स्पष्ट शब्दात मांडलं मत

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
सुपरस्टार नाना पाटेकर यांचे असंख्य चाहते आहेत. अनेक सिनेमांमधील दमदार भूमिका साकारणारे नाना पाटेकर हे आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. ते केवळ सिनेमाचं नव्हे तर त्यांच्या वक्तव्याने देखील प्रसिद्ध आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर अभिनेते नाना पाटेकर यांना अनेक पक्षाकडून ऑफर देण्यात आल्याची चर्चा रंगली होती.

‘आगामी निवडणुकीत भाजपला 350-375 जागा मिळतील आणि पुन्हा भाजप सत्तेत येईल. भाजप देशात उत्तम काम करत आहे. त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप पक्षाला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील.. देशाकडे भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही.’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी नाना पाटेकर यांचे भाकीत देखील चर्चेत आहे.

मागील दिवसांपासून नाना पाटेकर निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. दरम्यान आज मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर नाना पाटेक आणि मकरंद अनासपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पाटेकर यांनी आपली राजकारणातील प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केली. नाना पाटेकर म्हणाले, मला ऑफर असली तरी मी ही ऑफर स्वीकारणार नसून राजकारण हा आपला प्रांत नसल्याचे म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...