spot_img
महाराष्ट्रबोलत नाही, याचा अर्थ... भुजबळांच्या संभाजीनगर दौऱ्यानंतर जरांगे पाटील म्हणाले..

बोलत नाही, याचा अर्थ… भुजबळांच्या संभाजीनगर दौऱ्यानंतर जरांगे पाटील म्हणाले..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
मराठा आरक्षणाची मागणी सोडविण्यासाठी राज्य सरकारने आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आणखी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. त्यानुसार जरांगे यांनी सरकारला उपोषण मागे घेतल्यानंतर अल्टिमेटमही दिला आहे.

तर दुसरीकडे मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले असून ओबीसी समाजाचे नेते आक्रमक होत आहेत. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे पाटील यांनीही छत्रपती संभाजीनगर भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. समानता निर्माण करण्यासाठी आहे. ७० वर्षांच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाले असून अजूनही समाज मागासच आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण सरसकट ओबीसीतून नको, तर स्वतंत्र आरक्षण द्या, असा एल्गार ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. ते आज सकाळी छत्रपती संभाजीनगरहून -बीडकडे जात असताना अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या महामार्गावरील वडीगोद्री येथे बोलत होते.

यानंतर मनोज जरांगे यांना विचारले असता भुजबळांना भेटण्याचा काही संबंध नाही. पण, मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी बोलणार नाही. आरक्षणावर कोणी बोलत असेल तर मी सोडणार नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

१७ नोव्हेंबरला ओबीसींचा मोर्चा
मंत्री छगन भुजबळ यांनी दोदडगाव येथील मंडल स्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर वडीगोद्री येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, १७ तारखेला जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसीच्या महामोर्चाचे आयोजन केले असून सर्वांनी एकत्र यावे. निमंत्रणाची वाट न पाहता मोर्चाला या. सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन उपोषण, मोर्चे काढून एका आवाजात उभे राहावे लागेल. नाहीतर आपल्या लेकरा-बाळांचे भवितव्य धोक्यात येईल, असेही भुजबळ यांनी म्हटले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...