spot_img
अहमदनगरपुन्हा नवा ट्विस्ट ! राज्यसभेच्या सहाही जागा महायुतीकडेच..? एकदा पहाच राजकीय गणिते

पुन्हा नवा ट्विस्ट ! राज्यसभेच्या सहाही जागा महायुतीकडेच..? एकदा पहाच राजकीय गणिते

spot_img

मुंबई / नगर सहयाद्री : राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीत तीनच उमेदवार उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. परंतु आता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्याने या राज्यसभेच्या निवडणुकात पुन्हा ट्विस्ट आला. चव्हाणांच्या पक्षांतरानंतर भाजपनेही राज्यसभेच्या निवडणुकीत चुरस निर्माण करण्याचं ठरवलं आहे. कारण भाजप तीनऐवजी चार जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.

भाजप आगामी राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून चौथा उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतांच्या कोट्यानुसार भाजपला तीन जागा सहज जिंकता येणार आहेत. तर चौथ्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. याशिवाय अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक-एक जागा जिंकता येणार आहे. भाजपला तीन, अजितदादांना एक आणि एकनाथ शिंदेंना एक, अशा एकूण पाच जागा जिंकल्यानंतर उरलेल्या मतांतून सहाव्या जागेची बेगमी करावी लागणार आहे. याशिवाय अशोक चव्हाण आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या रुपाने भाजपला मोठी लॉटरी लागली आहे.

राज्यसभेवरील एका जागेसाठी मतांचा कोटा ४० इतका होत आहे. काँग्रेसचं विधानसभेतील संख्याबळ ४५ होतं. परंतु अशोक चव्हाण आणि सुनील केदार यांच्यानंतर ते ४३ वर गेलं आहे. आता अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमधील ३ आमदार चव्हाणांच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यभरातील १२ ते १४ आमदार अशोक चव्हाण समर्थक असल्याचंही बोललं जातं. त्यामुळे काँग्रेसची समीकरणं बिघडण्याची भीती आहे.

राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यास अपात्रतेची शक्यता असते. त्यामुळे निवडणुकीला गैरहजर राहून अप्रत्यक्षरित्या अशोक चव्हाण समर्थक आमदार पडद्यामागची मदत करण्याची शक्यता आहे. अर्थात काँग्रेसच्या पाठीशी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या समर्थक आमदारांची ताकद आहे. परंतु मतांची जुळवाजुळव करताना नाकी नऊ येऊन काँग्रेसवर निवडणुकीपर्यंत टांगती तलवार राहण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...