spot_img
अहमदनगर'नगरी' महिलेने 'मुंबई' कराला लावला 'इतक्या' लाखाला चुना! 'असा' घडला प्रकार?

‘नगरी’ महिलेने ‘मुंबई’ कराला लावला ‘इतक्या’ लाखाला चुना! ‘असा’ घडला प्रकार?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
नगरच्या श्रीरामपूर शहरातील एका महिलेने मुंबईच्या व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी किरण संपत शिंदे (वय ३४ रा. कुलाबा, मुंबई) यांच्या फिर्यादीवरून सदर महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदा दगडू पाठक उर्फ मंदा अण्णासाहेब जेवरे (सध्या रा. फ्लट नंबर १६, राधेय अपार्टमेंट, कांदा मार्केट रस्ता, श्रीरामपूर) असे महिलेचे नाव आहे.

सविस्तर वृत्त: किरण शिंदे यांनी नगरमधील एका मध्यस्थी मार्फत पुणे जिल्ह्यात शेत जमीन घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याच दरम्यान त्यांची महिलेसोबत सोबत ओळख झाली. त्यावेळी तिने तिचे नाव कुसुम रामराव कुमदाळे असल्याचे खोटे सांगितले. त्या नावाची बनावट कागदपत्रे दाखवत विश्वास संपादन करत वडिल किसन कुमदाळे यांचा मृत्यू दाखला दाखवून त्यावरून ती कुसुम रामराब कुमदाळे असल्याचे भासविले.

हवेली येथे गट नंबर ४२७/२ वर० हेक्टर ४५ आर शेत जमिनीची मालक असल्याचे सांगितले. सदरची शेत जमीन खरेदी करण्याच्या व्यवहारापोटी ३ मे २०२३ रोजी शिंदे यांच्याकडून नोटरी पब्लिक श्रीमती एस. एस. नगरकर, गुलमोहोर रस्ता, सावेडी येथे सदर शेत जमिनीची नोटरी करून घेतली व त्यांच्याकडून ३० हजार रुपये रोख व चार लाख ७० हजारांचा चेक घेतला.

दरम्यान शिंदे यांनी तिला फोन करून जमिनीबाबत विचारणा केली असता तीने टाळाटाळ केली. शिंदे यांनी चौकशी केली असता ती कुसूम रामराव कुमदाळे नसून मंदा अण्णासाहेब जेवरे असल्याचे स्पष्ट झाले. तिचा हवेली येथील शेत जमिनीशी कोणताही संबंध व मालकी हक्क नसल्याचे समजले. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....