spot_img
अहमदनगरमहापालिका कर्मचारी भरती प्रक्रिया रखडली; कारण काय?

महापालिका कर्मचारी भरती प्रक्रिया रखडली; कारण काय?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
महापालिकेची १३४ पदांची कर्मचारी भरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून पगार खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या आवश्यक असलेली पदे भरण्याबाबत प्रशासनाकडून विचार सुरू आहे. त्यामुळे यापूर्वी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस मार्फत सुरू झालेली प्रक्रियाही थांबली आहे.

आस्थापनेवरील मंजूर असलेल्या महापालिकेतील २८७१ पदांपैकी दीड हजारहून अधिक पदे रिक्त आहेत. तांत्रिक कर्मचार्‍यांची कमतरता असल्यामुळे कामकाजात अडथळे येत आहेत. त्यामुळे महापालिकेने राज्य शासनाकडे कर्मचारी भरती बाबत प्रस्ताव पाठवला होता. राज्य शासनाने महानगरपालिकेतील रिक्त पदांपैकी १७५ पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यातील १३४ तांत्रिक पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

याबाबतची सर्व माहिती महापालिकेकडून टाटा कन्सल्टन्सीला देण्यात आलेली आहे. कर्मचारी भरती प्रक्रियेअंतर्गत होणार्‍या परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असावा, याची सविस्तर माहितीही महापालिकेकडून देण्यात आली आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कामही सुरू झाले. मात्र, आता १३४ पैकी जी पदे तातडीने भरण्याची गरज आहे, तेवढीच भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पहिली प्रक्रिया ठप्प झाली असून पुढील आठवड्यात भरती प्रक्रियेबाबत निर्णय होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...