spot_img
ब्रेकिंगमुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर, पण कोट्यवधी कमावले! गुजरात टायटन्सलाही लागली लॉटरी

मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर, पण कोट्यवधी कमावले! गुजरात टायटन्सलाही लागली लॉटरी

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम
मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये क्वालिफायर २ मधून स्पर्धेतून एक्झिट घेतली. पंजाब किंग्सने अगदी सहज मुंबई इंडियन्सला पराभूत केले. आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या सहापैकी पाच सामन्यांत पराभव पत्करणारा मुंबईचा संघ क्वालिफायर २ पर्यंत पोहोचेल, याचा विचारही कुणी केला नव्हता. पण, रोहित शर्माला सूर गवसला अन् त्याच्यासोबत मुंबईच्या विजयाची मालिका सुरू झाली. सूर्यकुमार यादव, रायन रिकेल्टन, तिलक वर्मा, नमन धीर यांनी चांगला जोर दाखवला. पण, क्वालिफायर २ मध्ये पंजाबविरुद्ध ते कमी पडले. तरीही ते स्पर्धेतून कोट्यवधी कमावून गेले.

मुंबईने प्रथम फलंदाज करताना ६ बाद २०३ धावा उभ्या केल्या. तिलक वर्मा ( ४४), सूर्यकुमार यादव ( ४४), जॉनी बेअरस्टो ( ३८) व नमन धीर ( ३७) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ही धावसंख्या त्यांनी उभारली. पंजाबचा कर्णधार श्रेयसने ४१ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८७ धावा केल्या. त्याला जॉश इंग्लिसने ३८ ( २१ चेंडू) व नेहल वढेरा ४८ ( २९ चेंडू) धावा करून साथ दिली. पंजाबने १९ षटकांत ५ बाद २०७ धावा करून विजय मिळवला.

मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारे
७१७ – सूर्यकुमार यादव
४१८ – रोहित शर्मा
३८८ – रायन रिकेल्टन
३४३ – तिलक वर्मा
२५२ – नमन धीर
२३३ – विल जॅक्स
२२४ – हार्दिक पांड्या

सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
२२ – ट्रेंट बोल्ट
१८ – जसप्रीत बुमराह
१४ – हार्दिक पांड्या
११ – दीपक चहर
११ – अश्वनी कुमार
१० – मिचेल सँटनर

आयपीएल २०२५ मधील विजेता संघ २० व उप विजेता संघ १३ कोटी रुपये बक्षीस म्हणून जिंकणार आहे. पण, त्याचवेळी क्वालिफायरमध्ये बाद होणारा म्हणजेच मुंबई इंडियन्सचा संघ ७ कोटी रुपये घेऊन गेला आहे, तर एलिमिनेटरमध्ये पराभूत झालेल्या गुजरात टायटन्सला ६.५ कोटी मिळाले आहेत.

१० लाख – ऑरेंज कॅप
१० लाख – पर्पल कॅप
२० लाख – इमर्जिंग प्लेअर
१० लाख – मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअऱ
१० लाख – सुपर स्ट्रायकर
१० लाख – पॉवर प्लेअर
१० लाख – मॅक्सिमम सिक्स
१० लाख – गेम चेंजर

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाऊस अन पुरामुळे कहर! सर्वोतोपरी मदत करण्याचे पंतप्रधान मोदींचे आश्वासन….

नगर सह्याद्री बेव टीम : सध्या ईशान्येकडील भागात खूप विनाश झाला आहे. आसामपासून ते सिक्कीम,...

आमदार संग्राम जगताप यांनी घेतला टीकाकारांचा समाचार; किंमत नसणाऱ्यांना… , काय म्हणाले पहा

चाणक्य चौक आदर्श कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ अहिल्यानगर| नगर सह्याद्री मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची कामे...

गुन्हेगारांना सोडणार नाही ; एसपी सोमनाथ घार्गे नेमकं काय म्हणाले पहा

अहिल्यानगर| नगर सह्याद्री जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. पोलिसांनी आता अधिक दक्ष राहण्याची गरज...

शेतकर्‍यांनो पेरणीची घाई करु नका ; कृषी विभागाने दिला रेड सिग्नल, काय म्हणाले पहा

आता निघणार घाम | १२ जूनपासून मान्सून सक्रीय होणार मुंबई | नगर सह्याद्री देशातील शेती आणि...