spot_img
अहमदनगरकर्जुले हरेश्‍वरच्या सरपंचपदी सौ. सुनिता मुळे यांची निवड

कर्जुले हरेश्‍वरच्या सरपंचपदी सौ. सुनिता मुळे यांची निवड

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या कर्जुले हरेश्‍वर गावच्या सरपंचपदी सौ. सुनिता तुकाराम मुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री हरेश्‍वर ग्रामवैभव मंडळाने बहुमताने सत्ता हस्तगत केली होती.

पहिल्या अडीच वर्षासाठी सौ. संजीवनी आंधळे यांची निवड करण्यात आली होती. मंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार सौ. आंधळे यांनी राजीनामा दिल्यानंतर सौ. सुनिता मुळे यांचे नाव अंतिम करण्यात आले.

FILE PHOTO

सौ. संजीवनी आंधळे यांचा राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पंकज जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत सरपंचपदासाठी सौ. सुनिता मुळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अर्जाची छाननी होऊन तो मंजूर करण्यात आला. सरपंच पदासाठी विरोधकांनी अर्ज दाखल न केल्याने सौ. मुळे यांची बिनविरोध झाली असल्याचे श्री. जगदाळे यांनी जाहीर केले.

सौ. मुळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच ग्रामपंचायत चौकात फटाक्यांची अताषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. ग्रामदैवत श्री हरेश्‍वर महाराज मंदिरात विजयी सभा होऊन गावच्या विकासाचा रथ सक्षमपणे, सर्वांना विश्‍वासात घेऊन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ. सुनिता मुळे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार शिवाजी शिर्के, माजी सरपंच साहेबराव वाफारे, माजी सरपंच सौ. संजीवनी आंधळे, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष एकनाथ दाते, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ उंडे यांचीही भाषणे झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...