spot_img
ब्रेकिंगआमदारांना आमच्या योगदानाचा विसर, साडेचार वर्ष आम्ही फार भोगले..? कामोठेकरांनी भर सभेत...

आमदारांना आमच्या योगदानाचा विसर, साडेचार वर्ष आम्ही फार भोगले..? कामोठेकरांनी भर सभेत मांडले मत

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
खासदार डॉ विखे पाटील हेच पारनेर तालुका दहशतमुक्त करु शकतील. गेली साडेचार वर्ष आम्ही फार भोगले आहे. माजी आमदाराने या ठिकाणी येऊन आम्हाला धमक्या दिल्या आहेत. आमदार करण्यासाठी मुंबईकरांनी जे योगदान दिले त्याचा विसर पडला आहे.

खासदार विखे पाटील हेच या गुंडागर्दीला आळा घालू शकतील असे सक्षम नेतृत्व खासदार पुन्हा विक्रमी मताधिक्याने खासदार होतील यासाठी मुंबई पासून ते जिल्ह्यापर्यंतचे सर्व जनता एकमुखाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची खात्री कामोठे परिसरातील मान्यवरांनी दिली.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पारनेरकर, विजुभाऊ औटी मित्र परिवार व कोमोठे सांस्कृतिक युवा मंडळ आणि संदीप पाटील जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे दि. ७ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामोठेकरांनी आपले मत मांडले.

गुंडागर्दी थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार: खा. सुजय विखे पाटील
खासदार विखे पाटील यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपद होणार असून गेली दहा वर्षात सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले असून भाजपने मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. पारनेर तालुक्यात कशाप्रकारे गुंडागर्दी सुरू आहे हे सत्य समोर आहे. विकासाच्या नावाखाली काय सुरू आहे हे लोकांच्या लक्षात उशीरा आले आहे. आज जर लोकप्रतिनिधींना जर गोळ्या घालण्याच्या धमक्या देण्याचे काम होत असेल तर सर्वसामान्य जनता किती असुरक्षित आहे याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. पारनेर तालुक्यात गेली साडेचार वर्षात जी गुंडागर्दी सुरू आहे ती थांबवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून तालुक्यातील जनतेलाही आधारवड राहील अशीच भुमिका सातत्याने घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...