spot_img
ब्रेकिंगसलमानच्या घरावर फायरिंग करणारा कोण? मोठी माहिती समोर..

सलमानच्या घरावर फायरिंग करणारा कोण? मोठी माहिती समोर..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर रविवारी (१४ एप्रिल रोजी) गोळीबार झाला. ही घटना घडली तेव्हा सलमानसह इतर सर्वजण घरातच होते, पण कोणीही जखमी झालेलं नाही. सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली असून पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तपास करत आहेत.

सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सिनेसृष्टीतही खळबळ उडाली आहे. अभिनेत्याच्या घरावर गोळ्या झाडल्याची जबाबदारी तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोईने घेतली आहे. त्याची एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने हल्ल्याची जबाबदारी घेत हा फक्त ट्रेलर होता असं म्हटलंय आहे.

सलमानच्या घरावर फायरिंग करणारा कोण?
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात सहभागी असलेला विशाल राहुल उर्फ ​​कालू हा गुरुग्रामचा रहिवासी आहे. त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून त्याच्यावर 5पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये गोळीबार आणि दुचाकी चोरीसारख्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.

विशालवर गुरुग्राम तसेच दिल्लीतही अनेक गुन्हे दाखल आहेत. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून विशालने हरियाणातील रोहतक येथे एका बुकीची हत्या केली होती. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या घटनेत तो गोळीबार करताना दिसत आहे. विशाल हा राजस्थानचा कुख्यात गँगस्टर रोहित गोदाराचा शूटर आहे. रोहित गोदरा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....