spot_img
अहमदनगरमंत्री विखे पाटील यांनी सुप्यात साधला कार्यकर्त्यांशी संवाद! "आता गुंडागर्दी रोखण्यासाठी..."

मंत्री विखे पाटील यांनी सुप्यात साधला कार्यकर्त्यांशी संवाद! “आता गुंडागर्दी रोखण्यासाठी…”

spot_img

सुपा / नगर सह्याद्री
ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणूका असल्या की त्यात लक्ष घालायचे लोकांमध्ये दहशत निर्माण करायची दमबाजी करायची हे असले उद्योग तालुयात गेले साडेचार वर्षे सुरू होते. येणार्‍या निवडणुकीत याचे उत्तर तुम्हाला मतपेटीतून द्यायचे असून या त्रासाला जनता कंटाळली म्हणून डॉ. सुजय विखे यांचा विजय निश्चित आहे असा टोला महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता लगावला.

पालकमंत्री विखे पाटील यांनी बुधवार दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता पारनेर तालुयातील सुपा जिल्हा परिषद गटात सुपा येथील तालुका दूध संघाचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच दत्तात्रय पवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

मंत्री विखे म्हणाले की, महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. त्यात दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला असून आज पर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यावर सुमारे ७० कोटी रुपये जमा झाले आहे. काही दूध उत्पादक शेतकरी तालुयाच्या व जिल्ह्याच्या बाहेर दूध घालतात अशा शेतकर्‍यांना अनुदानापासून वंचित रहावे लागले. त्याचे मुख्य कारण म्हणजे कागदपत्रे सादर करण्यात अडचणी येऊ लागल्या.

परंतु त्याही आपण दूर केल्या आहेत. भविष्यात एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही विखे यांनी उपस्थितांना दिली. याचा निर्णय मी स्वतः घेणार असून मला कोणाला विचारायची गरज नाही. यामुळे जिल्ह्यातील दूध भेसळ कमी झाल्याचे आवर्जून सांगत भविष्यात भेसळ बंद करून निर्मळ वातावरण निर्माण करायचे असे सांगितले.

तालुयात हुल्लडबाजांची काही कमी नाही, त्यामुळे सुपा औद्योगिक वसाहतीमधील अनेक उद्योग बाहेर गेले याला सर्वस्वी जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत भविष्यात उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणारा खासदार आपणास निवडून द्यायचा आहे असेही ते म्हणाले.

यावेळी भाजपा नेते विश्वनाथ कोरडे, माजी सभापती काशिनाथ दाते, तालुका प्रमुख राहुल पाटील शिंदे, माजी तालुका प्रमुख सुनील थोरात, विक्रमसिंह कळमकर, सागर मैड, रामचंद्र मांडगे, माजी सभापती गणेश शेळके, सरपंच मनिषा रोकडे, योगेश रोकडे, दत्तात्रय पवार, सुनील पवार, सुरेश नेटके, अविनाश पवार, सुखदेव पवार, प्रतापसिंह शिंदे, राहुल पवार यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारनेर तालुका जिल्ह्यात आघाडी घेईल
तालुयात अनेकांना कशा ना कशा प्रकारे त्रास दिला आहे. त्याचा वचपा काढण्याची हीच वेळ आहे. तालुयात डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेहमीच झूकते माप दिले असल्याने पारनेर तालुका जिल्ह्यात आघाडी घेईल.
– राहुल पाटील शिंदे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...