spot_img
ब्रेकिंगनिवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

spot_img

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अन्य दोन व्यक्तींनी एक महत्त्वाची याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये भुजबळ कुटुंबीयांना 2021 मध्ये दोषमुक्त केल्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

न्यायालयाने भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना 9 सप्टेंबर 2021 रोजी दोषमुक्त केले होते. परंतु, त्या निर्णयाला दमानिया, दीपक देशपांडे आणि आमदार सुहास कांदे यांनी तीन स्वतंत्र याचिका दाखल करून आव्हान दिले होते. न्यायालयाने एप्रिलमध्ये या याचिकांवर नोटीसा बजावल्या होत्या, परंतु त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी थंडावली होती. आता या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीमुळे निवडणुकांच्या काळात भुजबळांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...

‘जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार’; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती..

पुणे । नगर सहयाद्री:- राज्यातील जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती...