spot_img
अहमदनगरMaratha reservation: सरकारचे निमंत्रण, जरांगे यांचा नकार! नेमकं प्रकरण काय?

Maratha reservation: सरकारचे निमंत्रण, जरांगे यांचा नकार! नेमकं प्रकरण काय?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत जवळ येत चाललेली असताना सरकारमध्ये हालचाली वाढल्या आहेत. या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकांमध्ये जरांगे पाटील यांना सरकारने निमंत्रण दिले आहे. मात्र जरांगे पाटील यांनी बैठकीला जाणार नसल्याचे सांगितले आहे.

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दिलेल्या मुदतीत सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे यांनी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. येत्या २० जानेवारीपर्यंत आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. अशातच, जरांगे यांच्या इशार्‍यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या वतीने हालचालींना कमालीचा वेग आला आहे.

मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे. बैठकीसाठी मनोज जरांगे यांना देखील उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र, आपण या बैठकीला जाणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत बोलताना मराठा आरक्षणावर चार मॅरेथॉन बैठक होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली.

बैठकांसाठी आले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. मात्र, आम्ही त्यांना सांगितले आहे की, आमचीच विनंती आहे, तुम्ही तुमच्या स्तरावर बैठका घ्या. येण्यासाठी आमच्याकडे वेळ कमी आहे. तुमचा निर्णय आम्हाला कळवा. आम्हाला काय पाहिजे हे त्यांना माहिती आहे. आमचे दोन शब्द मध्ये घ्या, इतकेच आमचे म्हणणे आहे. तुम्ही ते शब्द घ्या, कायदा पारीत करा, आम्ही असलो काय किंवा नसलो काय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....

‘हुजूर मराठे आ रहे हे’! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला मुंबईकडे कूच करणार

बीड । नगर सहयाद्री  येत्या 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसऱ्या दिवशी...

…हेच माझे राजकारणातील ‘गुरु’!, माजी खासदार सुजय विखे पाटलांचे वक्तव्य चर्चेत

अहिल्यानगर । नगर सहयाद्री गुरुपौर्णिमेनिमित्त माजी खासदार व भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शिर्डी...